बांबूप्रेमाचे नवे अंकुर.. भारताच्या वनसंपत्तीमध्ये ज्याला हिरवे सोने म्हणून संबोधिले जाते, त्या बांबूला आता राजकारणातही मोठे महत्त्व आलेले दिसत आहे. तसे नसते, तर आजवर केवळ आदिवासींच्या उपजीविकेचा मुख्य मार्ग असलेल्या या बांबूवर सरकारी नजर पडलीच नसती. देशात जवळपास ९० लाख हेक्टर वनजमिनीवर म्हणजे, १२ टक्के वनभागावर बांबूची लागवड आहे. आदिवासी क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आदिवासींच्या जीवनातील बांबूचे महत्त्व ओळखले आणि बांबूच्या शास्त्रशुद्ध वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षणेही सुरू केल्याने बांबू हा आदिवासींच्या जीवनशैलीच्या भरभराटीचे कारण ठरला आहे. विदर्भातील मेंढा लेखा गावाने बांबूच्या साह्य़ाने क्रांती घडविली आहे. येत्या वर्षभरात भारतातील बांबू उत्पादनांची बाजारपेठ २० हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे. त्यामुळे, बांबू हे केवळ जंगलात वाढणारे आणि आदिवासींच्या पोटापाण्यापुरते मर्यादित पीक राहिलेले नाही. आता याची जाणीव होऊ लागल्याने बांबूचे राजकारण उफाळणेही साहजिकच आहे. पर्यावरणाबाबतच्या सतर्कतेमुळे आता औद्योगिक क्षेत्रांतही बांबूचा वापर वाढू लागल्याने बांबूची मागणीदेखील झपाटय़ाने वाढत असून मागणी आणि उपलब्ध पुरवठा यांमध्ये मोठी तफावत भासू लागली आहे. साहजिकच, मोठय़ा प्रमाणात बांबू लागवड हाती घेणे हाच उपाय असल्याने सरकारनेही बांबू उत्पादनवाढीच्या नावाखाली योजनांचा धडाका लावला. सरकारी योजना सुरू झाली की मलिद्याचे मार्गही शोधले जातात. आदिवासींच्या जगण्याचे साधन असलेल्या बांबूवर त्यांचा अग्रक्रमाचा हक्क असावा यासाठी केंद्र सरकारने वन कायद्यात तसे बदल केल्याने बांबूच्या लिलावाच्या प्रक्रियेत ग्राम समित्यांचे महत्त्व प्रस्थापित झाले. याच कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्राने स्वतंत्र वनोपज नियमावली तयार केली असली, तरी त्यात अपेक्षित पद्धतीच्या लोकसहभागाऐवजी पुन्हा, ज्यांची आजवरची कार्यपद्धती सर्वज्ञात आहे अशा वन अधिकाऱ्यांचाच समावेश झाला. त्यामुळे येथेही मलिद्याच्या राजकारणालाच प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट झाल्याने, आदिवासी हिताच्या नावाने सुरू झालेल्या राजकारणाचा मुखवटा उघडा पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारची ही नियमावली आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्या अधिकारावरच अतिक्रमण करणारी असल्याने आदिवासी हिताच्या हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. राज्यपालांनीच बजावलेल्या सजग भूमिकेमुळे, बांबूच्या लिलावाचे ग्राम हक्क समित्यांकडून मिळालेले हक्क छुप्या मार्गाने हिरावण्याचा डाव या नियमावलीतून डोकावत असल्याचे स्पष्ट झाले. या समित्यांमध्ये वन अधिकाऱ्यांना घुसविण्याचा आणि लिलाव प्रक्रियेवरही त्यांचेच वर्चस्व राहील याची काळजी घेण्याचा उद्योग या नव्या नियमावलीमुळे सोपा झाल्याने, सरकारी बांबूप्रेमाच्या सुरस कथांना आता नवे अंकुर फुटणार आहेत. बांबूचे अर्थकारण भविष्यात वाढेल, हे ओळखून त्याच्या नाडय़ा वन अधिकाऱ्यांमार्फत आपल्या हातात ठेवण्याचाच हा उपदव्याप आहे, हे स्पष्ट आहे. विदर्भासारख्या आदिवासीबहुल भागात बांबूचे उत्पादन तेथील अर्थकारणाचा कणा ठरणार आहे. राज्य सरकारच्या नियमावलीचा आधार घेऊन या अर्थकारणावर पकड ठेवण्याचे राजकारण वेळीच केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्याने, आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या राजकारणाला लगाम बसला, हे खरेच खूप चांगले झाले.
On Sunday, September 14, 2014 9:38:35 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > आदिवासी विकास खात्यातील निधीला भ्रष्टाचाराची पालवी > > राज्याच्या दुर्गम भागातील आदिवासींच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या आदिवासी > विकास खात्याकडे प्रचंड निधी असून इतर खात्यातून येथे प्रतिनियुक्तीवर आलेले > ९९ टक्के अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहे. यामुळे आदिवासी विकास > खाते ही अधिकाऱ्यांच्या दृष्टीने भ्रष्टाचारांची गंगा झाली आहे. असे असले तरी > अन्य खात्यातून आदिवासी विकास खात्यात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे > 'इन्कमिंग' सुरूच असून अमरावती, नाशिकला नुकतेच दोन अधिकाऱ्यांना > प्रतिनियुक्तीवर नेमण्यात आले आहे. > आदिवासी विकास खात्याकडील निधीतून आदिवासींचा किती विकास झाला, हा वादाचा > मुद्दा असला तरी या निधीला भ्रष्टाचाराची पालवी मात्र सतत फुटतच राहिलेली आहे. > आदिवासींच्या विकासाचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागावे म्हणून शरद पवार > मुख्यमंत्री असताना या खात्यात अतिरिक्त आयुक्तपदावर भारतीय प्रशासकीय व > वनसेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे > या खात्यात प्रतिनियुक्तींची दारे उघडी झाली. नेमका त्याचाच फायदा घेऊन इतर > खात्यातील अनेक अधिकारी या मलईदार खात्यात येऊन गैरव्यवहार करीत असल्याचे > वारंवार निष्पन्न झाले आहे. १९९६ पासून आतापर्यंत या खात्यात प्रतिनियुक्तीवर > आलेले ९९ टक्के अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले. काही दिवसांपूर्वी > अमरावतीचे अतिरिक्त आयुक्त एस.झेड. वाळिंबे यांना ९० हजाराची लाच घेताना > रंगेहाथ पकडण्यात आले. नंतरच्या झडतीत त्यांच्याकडे कोटय़वधीची बेहिशेबी > मालमत्ता सापडली. वाळिंबे वनखात्याचे अधिकारी होते. प्रतिनियुक्तीवर ते या > खात्यात आले. या घटनेनंतर आता प्रतिनियुक्ती बंद करा, अशी मागणी खात्यातील > कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा > दोन अधिकाऱ्यांना या खात्यात प्रतिनियुक्तीवर धाडले आहे. > विशेष म्हणजे, ज्या अमरावतीत लाचखोरीचा प्रकार घडला तेथे मंत्रालयात उपसचिव > असलेल्या एका अधिकाऱ्याला प्रतिनियुक्ती दिली आहे. कक्ष अधिकारी म्हणून > मंत्रालय संवर्गात नोकरीत लागलेला हा अधिकारी उपजिल्हाधिकारी दर्जाचासुद्धा > नाही. त्याला थेट अतिरिक्त आयुक्त करण्यात आले आहे. दुसरा प्रकार नाशिकमध्ये > घडला आहे. नाशिकच्या अतिरिक्त आयुक्तपदी कृषी खात्यात सहसंचालक असलेल्या एका > अधिकाऱ्याला नेमण्यात आले आहे. > विशेष म्हणजे, आदिवासी विकास खात्यातील अतिरिक्त आयुक्त दर्जाची पदे > प्रशासकियव वनसेवेतील अधिकाऱ्यांनाच देण्यात यावी, असा शासनाचा नियम आहे. > त्याला बगल देऊन इतर खात्यातील अधिकाऱ्यांचे 'इन्कमिंग' या खात्यात सुरू झाले > आहे. आदिवासी विकासाशी संबंधित अनुभव किंवा दुर्गम भागातील माहिती किंवा काम > केल्याचा अनुभव एखाद्या अधिकाऱ्याला असेल तर त्याला प्रतिनियुक्ती देणे एक वेळ > समजू शकेल. मात्र, तसा कोणतीही अनुभव नसताना या अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. > पदोन्नतीची फाइल मंत्रालयातच > आदिवासी विकास खात्यातील अनेक अधिकारी आयुक्त दर्जाच्या पदोन्नतीसाठी पात्र > आहेत. मात्र, त्यांच्या विभागीय पदोन्नतीची फाईल मंत्रालयात गेल्या अनेक > वर्षांंपासून धूळखात पडली आहे. प्रतिनियुक्ती करता यावी, यासाठीच ती फाईल > अडवून धरण्यात आली आहे, असा अधिकारी संघटनेचा आरोप आहे. > > > http://www.loksatta.com/maharashtra-news/99-percent-tribal-department-officials-involved-corruption-895902/ > > > -- ----------------------------------------------------------------------- Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together! Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/967ed4da-0f53-4ae1-99fb-b08b26c65d0b%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

