Rahul Shengal<https://www.facebook.com/rahul.shengal.7?hc_location=timeline>
"नारायणगाव नावाचा देश"...! "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे माझे बांधव आहेत...! ही आपल्या सर्व भारतीयांची, भारत मातेची प्रतिज्ञा आहे. या प्रतिज्ञेनूसार सर्व भारतीय समान असून सर्वाँना आपली सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक,सांस्कृतिक प्रगती करण्याचा समान हक्क आहेत परंतू हे प्रतिज्ञेतील समानतेचे तत्व, विचार आदिवासीँसाठी नाहीत असे मला वाटते कारण महाराष्ट्र सरकार,सर्व आदिवासी आमदार व खासदार यांनी विषेश प्रयत्नातून भारतातील महाराष्ट्र राज्यात नारायणगाव (ता. जुन्नर) हा नवा देश निर्माण केला आहे व आणखी काही देश तयार करण्याचे काम जोरात चालू आहे ,त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व अभिनंदन .या नविन देशांच्या प्रतिज्ञा काय आहेत हे जाणुन घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आजही अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील बरेच आदिवासी रोजगाराच्या शोधात दरवर्षी ऊन्हाळ्यात नारायण गावाला जातात व एस.टी. स्टँडच्या एका कोपऱ्याला येवुन सरळ रांगेत भर ऊन्हात बसतात. काही वेळाने मोठ मोठे शेतकरी, बागाईतदार, व्यापारी येतात व आपल्या गरजेनुसार हवी असलेली २, ३, ५ माणसे घेऊन जातात. जो पर्यँत आपल्याला कोणी कामासाठी घेऊन जात नाही तोपर्यँत हे माझे आदिवासी बांधव त्या स्टँडवर राहतात. मग २ दिवस लागू द्या कि आठवडा कि महिना ते तिथेच राहतात. त्याचं कोणाला घेण देण नसत. ना समाजाला, ना आम्हाला. हा प्रकार खुलेआम चालु असतो पण कोणी काही बोलत नाही. पूर्वी जसा अमेरिकेत गुलामांचा बाजार भरायचा तसा आज भारतात पण भरतोय,फरक फक्त इतकाच आहे की तिथे निग्रोँ लोकांची विक्री व्हायची इथे आदिवासी विकले जात आहे हीच मोठी शोकांतीका आहे. आदिवासीँच्याच वाटेला का येतय असं हालाखीच, दुखाःच जीवन ? का आम्ही माणूस नाही ? आमच काय चुकलं चुकल ? आम्ही काय गुन्हा केला ? आमच इतकच चुकल की आम्ही तुमच्यावर आपला माणूस विश्वास ठेवुन तुम्हाला भरगोस मतांनी निवडून दिल. तुम्ही आम्हाला काय दिलं तर विश्वासघात व अठरा विश्व दारिद्र्य. असे असंख्य प्रश्न व त्यांची उत्तरे मनात दाबून ठेवून आजही आपल्याला या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी एखादा तरी गुलामांचा कैवारी अब्राहम लिंकन जरुर येईल या आशेवर व विश्वासावर आजही ते आपलं आयुष्य, जीवन जगत आहेत. त्यांना गरज आहे आधाराची कारण त्यांना आधार देणार त्यांच असं या जगात कोणीच राहिलेल नाही ना भगवान बिरसा मुंडा, ना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, ना क्रांतिवीर भागोजी नाईक, ना आदिवासीँचे कैवारी आदिवासीभूषन डॉ.गोविँद गारे कोणीच नाही. तो आधार त्यांना देण्याचं व त्यांचा आधार होण्याचं काम आदिवासी तरुणांना व सुशिक्षितीत आदिवासी बांधवांनाच कराव लागेल. त्यांची यातुन सुटका करण्यासाठी आदिवासी युवकांनी तरुणांनी व सुशिक्षित आदिवासींनीच पुढाकार घ्यावा लागेल. आजही अकोले तालुक्यातील भोजदरी गावात एम.आय.डिसी व्हावी हा प्रस्ताव गेल्या २० ते ३० वर्षाँपासून प्रलंबित आहे याला जबाबदार कोण ?आज नारायणगाव नारायणगावापर्यँत मर्यादित राहिले नसून तर कोकणात पण असे देश तयार होण्यास सुरवात झाली आहे. हे थांबवावच लागेल व ते आपणच थांबवू शकतो व थांबवणारच...! अशी आशा बाळगतो...! जय आदिवासी...! -- ----------------------------------------------------------------------- This mail is sent you by AYUSHgoogle group AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in Group of professionals who want to take initiative to develope tribal community, Let us do it together Our Online contact points : Home Page : www.adiyuva.in Join AYUSH : www.join.adiyuva.in Let us do it together : www.do.adiyuva.in Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in Face book profile : www.facebook.com/adiyuva Face book page :www.facebook.com/adiyuva1 You Tube : http://youtube.com/adiyuva twitter : http://twitter.com/adiyuva Linked In : www.linkedin.com/in/adiyuva --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtLOb9wqrVk2u4K-CoH0E3GVyXCnNaBKHspStOO4S2eZQ%40mail.gmail.com.

