Sir aaplyala adivashi yuva sangh ch i card pahijet sir ,jash ki aapan aadivashi hostel la cheking sati jat ahe tar applyala i card ashel tar lai chagal honar. jenekarun aaplyala kon ahe vichael tar aapan i card dakhavata yenar plz sir .
2015-02-15 11:00 GMT+05:30 Adi karyakram <[email protected]>: > स्वतंत्र आदिवासी राज्य निर्माण व्हावे...? आदिवासी समाज्याची ओळख हि > त्यांच्या सांस्कृतिक जीवन ,परंपरा ,व जीवनशैली ,पद्धती ,लोकगीते नाचगाणे > ,यातून होत आहे . आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर > रत्नागिरी,रायगड,पुणे,ठाणे,अहमदनगर,धुळे,नंदुरबार,जळगाव,औरंगाबाद,बुलढाणा,अकोला,अमरावती,यवतमाळ,नांदेड,नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली, > या जिल्ह्यात आदिवासिंच्या ४७ जमाती मोठ्या प्रमाणात वसलेल्या आहेत. आता या > सर्व जिल्ह्यांचा अभ्यास केला तर हे सर्व जिल्हे १००% आदिवासी आहेत असे म्हणता > येणार नाही पण या जिल्ह्यातील काही तालुके हे १००% आदिवासी मात्र आहेत. > स्वतंत्र आदिवासी राज्य निर्माण करायचे झाल्यास ते फक्त राजकीय पुढारीच करू > शकतात तेथे आपण जास्त डोकं लावण्यात काही अर्थ नाही. नाशिक मध्ये कालच माजी > आदिवासी विकास मंत्र्यांनी घोषणा केली कि “ स्वतंत्र आदिवासी राज्य निर्माण > व्हावे “ आणि मीडियातून नव्या वादाला तोंड अश्या मजकुरात बातम्या झळकल्या . हा > वाद तसा फार जुना आहे मात्र काल परवा समाज्यात आलेल्या आणि आम्ही आहोत म्हणून > आदिवासी समाज आहे असा विचार करणाऱ्या समाजसेवकांना काही महत्वाचे मुद्दे > सांगावेसे वाटतात . आणि मा.मधुकरराव पिचड यांनी काल केलेल्या घोषणेला आदिवासी > कार्यकर्त्यांनी खूप मनावर न घेता आत्मचिंतनाची गरज आहे असा सल्ला मी नक्की > देईल . २१ / २२ फेब्रु. २००९ नाशिक येथे झालेल्या ८ व्या आखिल भारतीयआदिवासी > साहित्य संमेलनात स्वागत अध्यक्ष म्हणून मा. मधुकरराव पिचड यांनी काही खूप > महत्वाचे मुद्दे मांडले होते व ते ठराव म्हणून घेतले होते ते आधी आपण पाहू . > ठराव क्र.१ : राज्यातील आदिवासी साहित्यिक,कवी,कथालेखक यांनी लिहिलेल्या > पुस्तकांना काव्यसंग्रहाना तसेच आदिवासींच्या संशोधन संस्थांना व प्रसिध्द > साहित्यांना अनुदान उपलब्द्ध करून दिले जाईल. आदिवासी लेखक,कवी,साहित्यिक > यांचे करीता स्वतंत्र योजना तयार करण्यात येईल व त्याची अंमलबजावणी त्वरित > करण्यात येईल. ठराव क्र.२ : आदिवासी साहित्य संमेलनदरवर्षी भरव्यासाठी आदिवासी > विकास विभागाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तशी तरतूद आदिवासी विकास > विभागाच्या अर्थसंकल्पातच करण्यात येईल. ठराव क्र.३ : शिक्षणासाठी आदिवासी > मुलाना त्यांच्या बोलीभाषेत पुस्तके लिहिली जावीत आणि आदिवासी बोलीभाषेतच > आदिवासी मुलांना शिक्षण दिले जावे. काही काळाने बोलीभाषा नष्ट होतील त्यामुळे > आदिवासी बोलीभाषेकरिता शिक्षण विभागाने विशेष लक्ष घालून आदिवासी बोलीभाषेची > पुस्तके तयार करावी ,आदिवासी बोलीतून शब्दकोश तयार व्हावे. ठराव क्र: ४, > भारतीय आदिवासी संस्कृतीक ठेव्याचे जतन करण्यात यावे आदिवासी संस्कृती > टिकवण्याची गरज आहे ,आदिवासींचे संरक्षण व संवर्धन करण्याकरीता केंत्रीय > स्तरावर आदिवासी संस्कृती विभागाची स्थापना करण्यासाठी भरीव प्रयत्न. ठराव > क्र.५ ,आदिवासी जमातींचे परंपरागत नियम कायदे हे त्यांचेजीवन पद्धतीत समावलेले > आहे . आदिवासींची जमात पंचायत असून आदिवासींच्या वेगवेगळ्या न्यायिक पद्धती > ,परंपरा लग्न पद्धती नियम कायदे यांचा अभ्यास करून कायद्याचे पालन करण्यासाठी > जावे. ठराव क्र.६: आदिवासींच्या शिक्षणासाठी किमान एक हजार लोकसंखेला प्राथमिक > शाळा अंगणवाडी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था केली जावी. ठराव क्र.७: आदिवासी > मुलांना दीड किलोमीटरपेक्षा शाळेचे अंतर जादा असता कामा नये शिवाय मुला > मुलींना त्यांच्या बोलीभाषेतच शिक्षण दिले जाईल. शिक्षक नेमताना आदिवासी > बोलीभाषा , आदिवासी संस्कृती माहित असलेला शिक्षक नेमला जाईल . ठराव क्र.८ > आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासाठी स्वतंत्र “आदिवासी > विद्यापिठाची” स्थापना करावी व नोकरी करणाऱ्या आदिवासी महिलांसाठी वसतिगृह > निर्मिती. ठराव क्र .९ आदिवासीकारीता राज्यसभा आणि विधान परिषद या सभागृहात > जागा आरक्षित कराव्यात आदिवासी साहित्यिक ,लेखक ,विचारवंत यांची नियुक्ती केली > जावी.पुणे येथील आदिवासी संशोधन संस्थेला डॉ. गोविंद गारे आदिवासी संशोधन > विभाग असे नाव देण्यात येईल. ठराव क्र. १० : आदिवासींना भारत देशात शिक्षण > नाकारले होते हा इतिहास आहे आदिवासींना शिक्षण मिळायला लागल्यानंतर आदिवासी > युवक युवती हे आदिवासींच्या संस्कृती,भाषा,धर्म,कला,या आदिवासिभिमुख > विषयांनाचा अभ्यास करत आहेत या विषय संशोधन करीता स्वतंत्र विद्यापीठ असणे > आवशक आहे या करीता अखिल भारतीय स्तरावर एक आदिवासी विद्यापीठ आणि महाराष्ट्रात > एक स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल . ठराव क्र.११ : आदिवासी > भाषा संस्कृती ,कला यांच्या संशोधनासाठी अकादमीची स्थापना करण्यात यावी तसा > प्रयत्न होईल . ठराव .क्र १२ : आदिवासी आरक्षणात किमान लोकसंखेचे प्रमाण > लक्षात घेवून पाच टक्क्यांनी वाढ व्हावी . असे अनेक महत्वाचे मुद्दे आणि घोषणा > झाल्या मात्र आज ६ वर्षानंतर त्यावर काय अंमलबजावणी झाली काही मुद्दे असील > कठीण पण पुण्यातील आदिवासी संशोधन संस्थेला “ डॉ गोविंद गारे” यांचे नाव नाव > देणे अगदी सोपे होते त्यावर अदयाप काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही . ९ ऑगस्ट > २०१३ च्या जागतिक आदिवासी दिनाच्या नाशिक येथील कार्यक्रमामध्ये मी स्वता मा. > पिचड साहेब यांना प्रश्न केला होता कि, पुण्यातील आदिवासी संशोधन संस्थेला डॉ. > गोविंद गारे यांचे नाव देण्याच्या तुमच्या मागणीचे पुढे काय झाले तर साहेब मला > म्हणाले होते “ या विषयावर दादा आणि आम्ही बसून निर्णय घेवू “ आता हा दादा कोण > आपल्या आदिवासींवर निर्णय घेणारा.आपले हित आपल्याला नको का कळायला .एका > पाठोपाठ एक खाजगी विद्यापीठ निघत आहेत मात्र २००९ नंतर एकदाही मा.पिचड यांनी > विद्यापीठबद्दल उद्गार काढले नाही त्यात आता आदिवासी स्वतंत्र राज्य > निर्मितीची मागणी . अर्थात लोकशाहीत कुणीही कशीही आणि कोणतीही मागणी करू शकतो > . पण या मागणी नंतर जे शिर्षका खाली बातम्या झळकल्या कि स्वतंत्र आदिवासी > राज्याची मागणी , नव्या वादाला तोंड म्हणजे आदिवासींसाठी काही मागितले कि वाद > होतो . आदिवासी राज्य निर्मिती हा खूप मोठा विषय आहे तो एका रात्रीत आणि एका > पंचवार्षिक मध्ये संपणारा विषय नाही आणि फक्त आदिवासी राज्य निर्माण होवून > आदिवासी माणसांचे प्रश्न एह्व्डे कमी आणि लवकर सुटतील असे कमकुवत नाहीत हा > भविष्यात आदिवासी राज्याची निर्मिती झालीच तर आदिवासी मुख्यमंत्री आदिवासी > मंत्रिमंडळ आणि आदिवासी माणसाची स्वतंत्र खुर्ची असेल हे नक्की . आज आदिवासी > राज्याची मागणी करत बसण्यापेक्षा आमच्या आदिवासी माणसाचे कुपोषण, बेरोजगारी, > कुमारी माता आदी हातातल्या गहन विषयांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे प्रत्येक > आदिवासी माणसाला गावातच रोजगार कसा उपलब्ध होईल याकडेही गांभीर्याने लक्ष > घालणे गरजेचे आहे . वाढत्या कुपोषणावर अध्याप देखील योग्य अभ्यास झाला नाही > जागतिक आरोग्य संघटनेने कुपोषणाची कारणे अगदी वेगळी दिली आहेत , आम्ही वेगळ्या > विषयावर बोंबा मारतोय फक्त आदिवासी महिलेला जेवण मिळत नाही म्हणून तिचे मुल > कुपोषित होते असा विचार करत असाल तर खरोखर या अभ्यासकांनी कुपोषण होण्याच्या > कारणांचा अभ्यास करावा असे मला वाटते. WHO, UNICEF , WABA या जागतिक आरोग्य > संघटनेने कुपोषणाची वेगळी कारणे दिलीत ( रोज कुपोषणावर बातम्या आणि लेख > लिहिणाऱ्याला एकही मुख्य कारण माहित नाही ) त्यापैकी ५% च कारणे आपल्याशी > जुळतात बाकी कारणांचा आपण सर्वांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. राहिला प्रश्न > आदिवासी विकासाचा तो राज्यासाठी ८.१६ एव्हडा आहे आणि यानुसार महाराष्ट्र > राज्याचे २०१४ या आर्थिक वर्षाचे बजट ४००० ते ४५०० कोटी रुपये होते तर एकटया > नाशिक जिल्ह्यासाठी ४५० कोटी तर ठाणे जिल्ह्यासाठी ४५० कोटी च्या जवळपास होते > मात्र योग्य अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी विकास थांबला आहे नवीन आदिवासी > राज्य निर्माण करण्याआगोदर ५ वी आणि ६ वी अनुसूचीमागे लागले आणि त्यात पेसा > कायदा व्यवस्थित राबवण्यासाठी अंमलबजावणी व्हायला हवी . त्यासाठी प्रयत्न > होताना दिसत नाहीत . असो मला फक्त एव्हडेच म्हणायचे आहे कि “ पुढे पाठ मागे > सरसपाट “ हा राजकीय नियम आहे आणि नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीवर टाळ्या पिटणे > हे आमचे कर्त्यव्य आहे. आमच्या नेत्यांनी आम्हाला फक्त” साहेब तुम आगे बढो हम > तुम्हारे साथ है ..!” यासाठीच ठेवले आह. एखाद्या कुत्रीने एका रात्रीत ८/१० > पिल्लांना जन्म दयावा तसे समाजसेवक तयार होत आहेत मात्र सामाजिक अभ्यास शून्य > . नेत्यांनी पण निदान नवीन घोषणा / आश्वासने देतानी जुन्या घोषणा / अश्वासने > विसरू नये . शिवाय कधीनवस नेत्यांची पुढारी लोकांची भाषणे ऐकणारया > कार्यकर्त्यांनी खूप चेकाळून टाळ्या पिटू नये कारण अशी लहानसहान वादळे हि येतच > असतात त्याने खूप फायदा किव्हा तोटा होत नाही डोळ्यांत धूळ मात्र उडते .बर मा. > पिचड यांनी स्वतंत्र आदिवासी राज्याची मागणी केलीय पण उर्वरित आमच्या २४ > आमदारांनी नको का “ मिले सूर मेरा तुम्हारा म्हणायला “ पण येथे सर्वच सत्तेत > मदमस्त झालेत खुर्चीची झापड डोळ्यावर चढलीय . चला पुन्हा एकदा महाराष्ट्र > राज्यात स्वतंत्र आदिवासी राज्यासाठी एका आदिवासी माणसाकडून सर्व आदिवासी > बांधवांना सुभेच्छा ...! या आदिवासी राज्यात पहिला मुख्यमंत्री जो कुणी > आदिवासी माणूस होईल त्याने मला शिपाई म्हणून मंत्रालयात कामाला घ्यावे असाच > नवस आज मी देशातील महान ग्रंथ “ राज्यघटनेला ” करतो ...कुणा कार्यकर्त्याच्या > नेते प्रेमाच्या भावना दुखावल्या तर माफी असावी . मागे आदिवासींना दिलेली > आश्वासने तुमच्या लक्षात नसतील पण एक आदिवासी म्हणून माझ्या लक्षात आहेत . > तुम्ही फक्त माज , गर्व करत बसा ... > जय आदिवासी ,जय भगवान बिरसा . > विजकुमार घोटे 09623701709 > > -- > Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit > form at :www.event.adiyuva.in (share with your friends) > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrpaBhgu52jdSA2Bf-iGyAhZcQ1xJAsQXf6mLuiQSOCb5g%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrpaBhgu52jdSA2Bf-iGyAhZcQ1xJAsQXf6mLuiQSOCb5g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Thanks & Regards Milind Sakhare -- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD9mQX0VJLxpKvShpEkTAu%2BoFNnTo4PkVXD181xWnOB3aTGxPA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

