नमस्ते! दिनांक २० रोजी पुणे MSCERT येथे झालेल्या आदिवासी बोलीभाषा 
अभ्यासक्रम निर्मिती उपक्रम सादरीकरणबैठक संपन्न झाली. त्यात राज्यभरातून 
अंदाजे ३० लेखक/कवी/संशोधक उपस्तीत होते. आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी, संचिता 
सातवी, संपत ठाणकर, राजू ठोकळ, योगेश सापाटे, भास्कर भोसले उपस्तीत होते. सचिन 
सातवी यांनी आदिवासी समाज आणि शिक्षण पद्धती त्यातील समस्या आणि उपाय व शालेय 
अभ्यास क्रमात आदिवासी जनजीवन, आदिवासी संस्कृती मुल्य, पारंपारिक ज्ञान, 
रोजगाराभिमुख आधारित अभ्यासक्रम असावा या साठी यावर दिलेल्या वेळेत 
प्रेझेन्टेशन दिले. संपत ठाणकर यांनी आदिवासी चित्रकलेत असलेले विज्ञान आणि 
सामाजिक मुल्य याची आठवण करून दिली, वारली चित्रकलेचे सविस्तर टप्या टप्याने 
विस्तृत माहिती सोबत महत्व पटवून दिले. भास्कर भोसले यांनी पारधी बोली भाषेतील 
बाल भारती ला निवडलेली कविता वाचून पारधी भाषे कडे होणार्या दुर्लक्ष यावर 
लक्ष वेधले. MSCERT च्या माहिती नुसार सध्या त्यांनी निवडलेल्या १० बोली 
भाषावार (वारली,भिली,पावरी,मावची, निहाली,परधान,गोंडी,कोलामी, कोरकू , कातकरी) 
टप्या टप्प्याने काम केले जायील. त्या साठी निवडक लेखकांना पुणे येथे 
अभ्यासक्रम निर्मिती च्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पण या 
निमित्ताने प्रेझेन्टेशन मध्ये आलेले आदिवासी शिक्षण संबधी आलेले ठळक आणि 
महत्वाचे मुद्दे आपल्या माहिती साठी १) सध्याची शिक्षण पद्धती आदिवासींचे 
सावलंबीपण आणि समाजाची असलेली नाळ त्या वेगाने नष्ट होण्यास हातभार लावीत आहे 
२) आदिवासी मध्ये वाढत असलेली साक्षरतेचे प्रमाण त्याच प्रमाणात रोजगार मिळवून 
देवू शकले नाही. (२००३ पर्यंत फक्त ४% आणि २०१४ पर्यान्त फक्त १ % आदिवासी 
युवकांना नोकरी मिळाली) ३) सामाजिक नेतृत्वाची जडण घडण आणि आदिवासी समाजाचे 
प्रश्न सोडविण्य साठी चिकित्सक आणि अभ्यासू पाया घडवण्याच्या अभाव ४) वसतिगृह 
, शाळा,प्रवेश, विद्या वेतन, इत्यादी विविध मुलभूत सोयी सुविन्धांचा अभाव. ५) 
शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम ६) आदिवासी संस्कृतीची 
ओळख नसलेल्या शिक्षका मुळे होणारे दूरगामी परिणाम ७) सांस्कृतिक ओळख आणि 
पारंपारिक ज्ञान जतन करण्यासाठी घातक उदासीनता आणि त्या बद्दल न्यूनगंड तयार 
करणारी पद्धती ८) शिक्षण आणि स्वयंरोजगार किवा रोजगारा साठी लागणारी कौशल्य 
यांची सांगड घालण्याची अवशक्यत ९) आदिवासी विद्यार्थ्यातील सुप्त गुण हेरून ते 
वृद्धिंगत करून प्रोत्साहन देणे १०) स्थानिक नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करून 
सस्टेनेबल विकास करून आदिवासी समाज सुरक्षित करण्याचा पाया आणि नेतृत्व तयार 
करणे इत्यादी विविध विषयावर आदिवासी म्हणून सविस्तर विचार मांडले. त्या 
निमित्ताने शिक्षण पद्धतीत विविध पूरक असे बदल करून आदिवासी समाजाचे अस्तित्व, 
अस्मिता, स्वालंबी पण, सांस्कृतिक ओळख सामाजिक एकोपा आपण तयार करू शकतो या 
दृष्टीने साशाकीय आणि बिगर शाशकीय पातळीवर सगळ्यांनी एकत्र येवून पर्यंत 
करण्याची गरज आहे. Lets do it together! आपल्या माहिती साठी : दिनांक २२ रोजी 
पुणे येथे होणारया राज्य स्थरीय आदिवासी परिषदे मध्ये सहभागी होतो आहोत. AYUSH 
| adivasi yuva shakti | www.adiyuva.in 










-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/91790798-3cf0-4e5b-96ed-684817181b56%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to