नक्की,.. लवकरच कृतीशील विचारमंथनाचा उपक्रम यावर राबविता येईल .
On May 14, 2018 7:20 PM, "AYUSH | adivasi yuva shakti" <adiy...@gmail.com> wrote: > ।। पालघर लोकसभा पोटातली निवडणूक ।। > > [आदिवासी बोली भाषा] > बारीक होतुं त वेग वेगले ठिकाणी पार्ट्यांची चिन्ह ना घोषणा गेरू खाल भीतीवर > लिहेल रेहेत. माना भलता आवड वाचया. याचा जिंदाबाद त्याचा मुर्दाबाद, यो जय, तो > जय, आले रे आले, गेले रे गेले. ना काय ना काय. > मुरबाड/कासा/वानगाव/उधवा/तलासरी/डहाणू > इत्यादी परिसरात हमखास नंगाया मिलत. तंव्हा भांडना हो फार होत, एक एक गाव > पार्टी पार्टी चा दसां रेहे. एक गाव मिलून बीजे गांवासी कज्या करीत. मंगा हलूं > हलूं एक कुटुंब एक पार्टी असा होत गेला, जसा काय धर्मच. आपली मानसा हो ओढी > प्रामाणिक काय आजोबासनी जे चिनावर मत देत त्यावरूच त्याची पोरा ना त्याची > पोराहो. पन आथा हलूं हलूं बदलाया लागलाहे, ओढा बदलाहे का एकेच घरात ३-४ पार्टी > ची पदा. नेता हो जिकडं खाया मिलल तिकडं हिवरत, कव्हां यी पार्टी कव्हां ती > पार्टी. लोखा बिचारी सगला सोडून यांचे नादाला लागून आपल्या आपल्यात कज्या > करीत. ते खुस्याल मज्या करीत हिंडत. तय बेस मानसा निवडाल त बेस काम होल > लेखांसाठी. > > [साधारण मराठी] > पूर्वी एक गावाचा एक राजकीय पक्ष असायचा, नंतर एक कुटुंब एक पक्ष असायचे, > नंतर एकाच घरात अनेक पक्षांची पदे बघायला मिळाली, निवडणुकी आधी उमेदवारांच्या > या पक्षातून त्या पक्षातल्या उड्या पण सगळ्यांनी बघितल्या. असो पक्ष/उमेदवार > निवड प्रत्येकाचा वयक्तिक निर्णय, ज्याला जो योग्य वाटतो तो घ्यावा. पण > आदिवासी समाज हितासाठी पुढील विषय गांभीर्याने विचार करावा हि अपेक्षा. > > आदिवासी समाजा समोर अगणित आव्हाने आहेत, रोज त्यात वाढ होतेच आहे. पालघर > जिल्ह्याचे बोलायचे झाल्यास जल जंगल जमीन जीव या सोबत अस्तित्वाचाच प्रश्न > समोर आहे. कदाचित याची जाणीव मोजक्यांनाच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला पाणी > देण्यासाठी ज्या गावाच्या जमिनीवर धरणे बांधलीत त्या गावांना ४० वर्षानंतर पण > प्यायला पाणी नाही. वरून अक्राळ विक्राळ वाढत असलेले वसई विरार भायंदर > उरलेल्या पाण्यावर ताव मारायला तयार आहेतच. चांगले शिक्षण मिळवून करियर बनावता > यावे यासाठी आश्रम शाळांत काय होते आहे आपल्या समोर आहे. स्थानिक पातळीवरचे > रोजगार डोळ्यांसमोर कसे पळवले जातात हे पण बघितलेय. रस्त्या/नाक्यावर च्या > जमिनी कश्या कब्जा करून बिगर आदिवासींच्या वसाहती आणि गावे वसली आहेत सोबत > वाढणारे गुन्हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. विद्यार्थी/कर्मचारी आणि येथील काही > लोप्रतिनिधी पण बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या प्रकरणातले आहेत. आरोग्य वीज पाणी > रस्ते प्रशासन यांची सद्यस्थिती दिसतेय डोळ्यांसमोर. हे कमी कि काय "देश > हिताचे" १४ पेक्षा जास्त मेगा प्रकल्प या परिसरात नियोजित आहेत, आणि त्यासाठी > भूमी अधिग्रहण सगळ्या माध्यमातून सुरु आहे. सगळे लिहायला जागा कमी पडेल > एव्हड्या समस्या आहेत. > > या सगळ्या परिस्थितीत येथील लोकप्रतिनिधी कसा असावा? > पूर्ण समाजाचा आवाज, अपेक्षा, प्रसाशनाला धारेवर धरून आदिवासी समाज हितासाठी > संविधानिक अधिकार, ध्येय, धोरणे राबविण्यासाठी, आदिवासी समाज हिताचे कार्य > पुढे रेटणारा, निस्वार्थ हेतूने समाज हित प्राथमिकतेने जपणारा. > > पण आपल्याकडे खूप अगदी ठराविक पद्धतीने ठरवून प्रत्येक पक्षातून, त्यांना > अपेक्षित काम/भाषा बोलणारे अनुकूल प्रतिनिधी बनवले जातात (तुरळक अपवाद वगळता). > कधी अर्ध शिक्षित, कधी दूरवरून आयात केलेले, तर कधी सामाजिक कार्याशी नाळ > नसलेले असतात. > > वयक्तिक पातळीवर आपले पूर्वीचे खासदार चिंतामण दादा वनगा यांच्याशी अनेक > विषयांवर चर्चा व्हायची. खासकरून स्थानिक रोजगार निर्मिती, वारली चित्रकला चे > बौद्धिक सपंदा हक्क, कलाकारांचा मोबदला, स्थानिक आदिवासी नेतृत्व, भविष्यातील > आव्हाने, सध्याच्या समस्या, इत्यादी. समाज म्हणून आदिवासी समाजाचे नेतृत्व > तयार व्हावे यासाठी ते आग्रही होते, या संदर्भात लवकरच काही कार्यक्रम सुरु > करण्याचा त्यांचा मानस होता. ते ज्या परिस्थितून ज्या वातावरणात तयार > झाले/घडले. त्यांनी समाजा/पक्षासाठी जो त्याग करून स्वतःची एक ओळख तयार केली, > बऱ्यापैकी अनेक प्रामाणिक प्रयत्न केले. अगदी जेव्हा लागेल तेव्हा > पक्षाच्या/सरकार च्या विरोधात जाऊन स्पष्ट भूमिका घेतली. पाणी परिषद, > भूमिसंपादन, किंवा इत्तर असे त्यांचे विरोधक हि हे मान्य करतात. (वयक्तिक > रित्या डहाणू नोटिफिकेशन संदर्भात त्यांची भूमिका न पटणारी होती. या विषयवार > त्यांना कळवले पण होते सविस्तर चर्चा ठरली होती). त्यांचे अचानक जाणे > धक्कादायक होते. असो... > > या वेळेस पण दुर्दैवाने लोकसभेसाठी विश्वासाचे एक हि नाव चर्चेत नाही, कि > ज्याकडून सामान्य लोकांच्या, आदिवासी समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील. जर > आदिवासी नेतृत्वासाठी आपण चांगला पर्यायच तयार करू शकत नाही तर बाकीचे खूप > लांब आहे, येथे फक्त पक्ष जिंकेल आदिवासी समाज हिताचा विचार नाही. कदाचित कुणी > एक खासदार बनेल त्याचे कुटुंब पुढे जाईल, त्यांचे कार्यकर्त्यांचा फायदा होईल, > त्यांच्या नातेवाईकांचा फायदा होईल, त्यांचे गाववाले (तालुका/जिल्हावाले) > फायदा करून घेतील, त्यांची पार्टी पुढे जाईल. पण येथील स्थानिक आदिवासी > समाजाचे काय? कोण वाली ? > > मतदान करून, चांगला पर्याय निवडा, योग्य पर्याय नसेल तर पर्याय तयार करण्याचा > कामाला लागा. > वयक्तिक/राजकीय लाभासाठी निवडणुक ऋतूला तयार होणारे नेतृत्व पेक्षा, सामाजिक > चळवळीतला, समाजासाठी झोकून दिलेला, समाजाशी प्रामाणिक, अधिकार यांचा अभ्यास, > कणखर आणि नेतृत्वगुण निपुण. त्याला पक्ष असेल नसेल तरी चालेल पण आदिवासी समाज > हितासाठी सर्वस्वी पणाला लावणारा पर्याय तयार करूया. > > उदाहरण, जसे डॉ सुनिल दादा पऱ्हाड जो आपले करियर सोडून निस्वार्थ पूर्ण वेळ > आदिवासी समाजासाठी देतोय. जल जंगल जमिन आणि अस्तित्व हीच एक दिशा बनवून स्वतः > प्रयत्न करतोय. आदिवासींच्या प्रत्येक प्रश्नासाठी धडपडतोय. > *आहेत का असे पर्याय आपल्याकडे? अशांना आपण मजबूत करू शकतो? अश्यांची आणखीन > मोठी फळी तयार करू शकतो का? > > असे नेतृत्व आपल्याना लोकप्रतिनिधी म्हणून समाजातून पुढे आणता येईल का?* > > आपले मत कळवावे .... जोहार ! > > -- > Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ > ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ > msgid/adiyuva/d6522b2c-7dba-422a-8718-5246ff239555%40googlegroups.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d6522b2c-7dba-422a-8718-5246ff239555%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBANL8dAOhrTn7JmMEWy2rX9wybooTTc%3Dh9YRyEHhT4EVg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.