I think you should not use "Vanvasi" word considering following points. 1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes who r forest dwellers? 2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u define forest? 3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is dwindling. 4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar proclaimed tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r subsituting & giving them this perceived derogatory term of Vanvasi? Few more points for correction assuming u know it not & what u wrote was not deliberate. 1) Castes & tribes r different; I wont explain pls research. 2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r different. I know it. U pls read more. 3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story where Britishers look complete Villain, but the reality cd be different demanding deeper & systematic investigation.
Best, Santosh On Jun 23, 2015 5:54 PM, "e vansakha quarterly magazine" < evansa...@gmail.com> wrote: > कातकरी म्हणजे कोण ? > चलो जलाये दीप वहा > जहा अभीभी अंधेरा है! > (वनवासी कल्याण आश्रम) > > ८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या > गावात, कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण > ग्रामविकास संस्था यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील > वसतिगृहात देखील नव्याने भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील > असा प्रयत्न आश्रमाचे कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण > आणि त्यांच्याकरिता असे विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या > कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख > लिहीत आहे. > > राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम > भागात शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी > पत्नी सौ. विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील हिम्मत शाळेत होते. > परिसरातल्या बचत गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन > चालकाचे होते. पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि > अन्य कार्यकर्त्या आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी > आणि व्यास सर तिकडे प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा > हळूहळू कातकरी या विषयावर आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता > येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता > व्यास सर म्हणाले कि संस्थेचे माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता > येईल आणि तिथून जवळच सेनापती बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय. > आहे. तिथे मुले शिकू शकतील. > > पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे > सर्वजण उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि > लाकडी वस्तू उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील > वाघमारे आणि मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन > राहायला तयार झाले. पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या > प्रस्तावाने इतके आनंदित झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास > सुरु केला. प्रत्येक कातोडीतून विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. > त्याला प्रयत्नांची जोड या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र > उत्साहाचे वातावरण आहे. > > वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही > यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला > तर त्याची माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही > उमटत नाही. कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते. > त्याचं उत्साह कातोडी वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि > कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज > हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की > निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला मिळवण्याच्या अर्जावर सही करायला > बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे > आणायचे हे खरे आव्हान आहे. > > भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे > आहेत. उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे > शिकू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका > समुदायाला एकेक काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये > स्वत:साठी वापरायची अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या > बनविण्याची कला गावात सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा > दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड > करतात. > > भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती > जनजाती कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे > बांबूच्या वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला, > शिकारीची कला, अशा विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन > होते कात बनविणे आणि विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि > मनोरंजनासाठी. > > या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर, > इंग्रजांच्या पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी > करावी लागेल. इंग्रज येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या > सीमाभागातील, "खैराची" व इतर विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता. > झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत > असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात > बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची निवड, कात बनवण्याच्या > प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य भागांचे वर्गीकरण, > झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य वापर, अर्काच्या > वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याशी > वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण करण्याची हातोटी > अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी माणूस हा विविध > आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे. > > स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे > मध, लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या विविध > गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची > न्यायव्यवस्था कातकऱ्यांकडे होती. आज जरी ही जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली > असली तरी, त्या काळी ही एक चांगली व्यवस्था होती. > > इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली. > इंग्रजांनी गावातील शेत जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी > जंगले नोंदवून त्यांची महसुलाची व्यवस्था बसवली. कातकरी समाज ज्या जंगलात > वावरत होता ते खाजगी नसून समाजाचे होते, सामाईक होते. हा समाज साधारणपणे > शासकीय यंत्रणेच्या समोर जाणारा नसल्याने, तो जंगलावर स्वत:चे नाव लावण्यास > पुढे आला नाही. इंग्रजांनी वनखाते निर्माण करून ही सर्व जंगले स्वत:च्या > ताब्यात घेतली. इथून कातकऱ्यांचे दुष्टचक्र चालू झाले. ताब्यात घेतलेल्या या > जंगलांवर इंग्रजांनी कंत्राटदार नेमले. जंगल संपत्तीची लुट करून इंग्रज > सरकारची तिजोरी भरायची हा या कंत्राटदारांचा उद्योग होता. आजवर कातकरी समाज > आपल्या गरजेप्रमाणे खैराची झाडे तोडून, आपल्याला आवश्यक तितक्या धना पुरता कात > बनवीत असे. आता मात्र इंग्रजांच्या अमर्याद लोभापायी वारेमाप जंगलतोड सुरु > झाली. तोडलेल्या लाकडाचा मालक इंग्रज होता. त्याचे पैसे भरण्याची क्षमता > कातकऱ्याकडे नव्हती. > > इथे बोहरी आणि पारशी कंत्राटदार पुढे आले. काताचे कारखाने यांनी चालू केले > आणि कातकरी हा मजूर बनून तेथे राबू लागला. कारखाने इतक्या वेगाने खैर संपवू > लागले कि, आपला मूळ प्रदेश सोडून अन्य प्रदेशात जसे कारखाने स्थलांतरित होऊ > लागले, तसे कातकरीही स्थलांतरित होऊ लागले. म्हणून आज कातकरी रत्नागिरीपासून > सुरत पर्यंत आणि पूर्वेला पुणे जिल्ह्यात देखील आढळतो. > > एका संपन्न, कौशल्यपूर्ण, आरोग्यपूर्ण व्यावसायिक समाजाचे अशा रीतीने > दरिद्री; कुपोषित मजूर समाजामध्ये रुपांतर इंग्रजांमुळे झाले. हे होत असताना > अन्य समाज आपले हितसंबंध राखताना इतक्या व्यग्र होता कोणी कातकरी लोकांना > त्याबाबत जागृत देखील केले नाही. आपल्या नावावर कोठेही जमिनीचा एखादा साधा > तुकडा मिळवण्यातदेखील कातकरी समाज अपयशी ठरला, हीच त्याची शोकांतिका आहे. > > हळूहळू काताच्या छोट्या कारखान्यांचे भव्य कारखान्यात रुपांतर झाले. कातकरी > माणसाकडे असलेल्या कौशल्यांची नव्या कारखान्यांना गरज नव्हती. त्यामुळे हळूहळू > कातकरी माणूस या व्यवसायातून बाहेर फेकला गेला. कटाची भट्टी बंद पडली आणि मग > सुरु झाल्या विटांच्या भट्ट्या, कोळशाच्या भट्ट्या आणि सर्वात शेवटी दारूच्या > भट्ट्या. कोळसा आणि विटांच्या भट्ट्यात कातकरी हा मजूर असतो कारण भांडवल खूप > लागते. दारूच्या भट्टीसाठी एकतर भांडवल कमी लागते आणि दुसरे म्हणजे हा > पोलिसांच्या धाकाखालील धंदा असल्याने, गावकरी कातकऱ्यांना या धंद्यासाठी > भांडवल देतात, आणि भट्टी चालू करण्यास प्रोत्साहन देतात. हा धंदा करणाऱ्या > माणसाच्या घरात भरपूर पैसा खेळतो पण स्वास्थ्य मुळीच नसते, कारण संपूर्ण > गावावरून ओवाळून टाकलेली माणसे तिथे येत असतात आणि घरातील माणसांनाही वाईट > व्यसने लागतात. > > वाडीतील छोटी मुले शाळेत जाताना दिसतात, त्यातील बरीचशी मुले मध्येच शाळा > सोडतात आणि माध्यमिक शाळेत तर तुरळक कातकरी मुले दिसतात. इतर मुलांच्या मानाने > त्यांना घरी मिळणाऱ्या सुविधा या फारच कमी असतात. मासे पकडायला, खेकडे पकडायला > जाणे अशी विविध प्रलोभने असतात. त्यामुळे शिक्षणात लक्ष कमी आणि प्रगतीही > कमी.या सर्व परिस्थितीतही पदवी मिळेपर्यंत शिक्षण घेणारी कातकरी मुले पाहिली > की खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. या अशाच मुलांना पुढील आयुष्यात स्थिर होता > यावे यावर देखील आश्रमाचा भर आहे, प्रयत्न आहे. > > पनवेलच्या आश्रमातून शिकलेला अनिल वाघमारे हा विद्यार्थी वारली चित्रकला > शिकून आज तोच त्याचा व्यवसाय म्हणून काम करत आहे. त्याच्या व्यवसायात > त्याच्याच गावच्या अजून दोन कातकरी मुलांना रोजगार मिळाला आहे. आश्रमाचे एक > विद्यार्थी एकनाथ वाघे हे आता शिक्षक झाले आहेत. पनवेल अर्बन बँकमध्ये काम > करणारे सुदाम पवार हे आश्रमाचे विद्यार्थी तर आहेतच परंतु आता ते आश्रमाच्या > विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. अशी उदाहरणे अनेक आहेत पण समाजाला बदलाच्या > वाटेवर घेऊन जाण्यास त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.गरज आहे आपण सर्वांनी > त्यांचे हात बळकट करण्याची. > > कातकरी समाज सध्या पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे व पालघर > जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतो. या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी > कातकरी समाजात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य करण्याची खरोखर मुख्य निकड आहे. आपण > पुढील उपक्रम हाती घेऊ शकता:- > > १) एखाद्या कातोडी मधील सर्व मुले शाळेत जातील यासाठी प्रयत्न करणे > २) मुलींची लग्ने योग्य वय झाल्यावरच करण्यासाठी प्रबोधन, जनजागरण करणे > ३) कातोडीतील महिलांकडून झोपडीत करून घेण्यासारखी छोटी कामे शोधून, त्यांना > शिकवून, रोजगार निर्माण करून देणे > ४) "नाग्या कातकरी" या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्याची माहिती सर्वांपर्यंत > पोहोचवणे > ५) कातोडीमध्ये "सुंदर माझे घर" अशी स्पर्धा घेऊन, काही गृहोपयोगी बक्षिसे > वितरीत करून एकप्रकारे कातोडी स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करणे > ६) संस्कार वर्ग चालवणे > ७) दारू गाळण्याचा उद्योग करणाऱ्या कुटुंबांना प्रबोधन करणे, त्यांना पर्यायी > उद्योग देणे > ८) शिक्षित व अर्धशिक्षित मुला-मुलींना छोटे अभ्यासक्रम, प्रशिक्षण देऊन, > नोकऱ्या मिळवून देणे, तसेच छोटे व्यवसाय स्थापन करून देणे > ९) घरे बांधण्यासाठी जागा मिळवून त्यांच्या मालकीची करून देणे, स्थिर वसाहत > करणे > १०) लग्नातील अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रबोधन करणे, सामूहिक विवाहासारखे > उपक्रम राबवणे > ११) कातकरी मुला-मुलींसाठी खेळाच्या स्पर्धा भरवणे, प्रोत्साहनपर बक्षिसे > वितरीत करणे > > आपण स्वत: कातकरी वस्त्यांवर प्रवास केलात, तर आपल्या अनुभवानुसार आपल्याला > इतर अन्य उपक्रमही सुचू शकतील आणि आपण ते ही करू शकाल. कल्याण आश्रमामध्ये > कातकरी जनजाती मधील अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे कातकरी > समाजात काम करणारे अनेक शहरी कार्यकर्ते आहेत. आपण या सर्वांचे सहकार्य घेऊ > शकता. आम्ही आपल्या बरोबर काम करण्यास निश्चितच उत्सुक आहोत आणि तयार आहोत. > > आपले नम्र, > > नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२ (7709013232) > ऋषभ मुथा - ९३२५०९३८४० (9325093840) > सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८ (9921574108) > > www.vanvasi.org > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGwE%3Dxh%3D89GnXw5dvHCsnBFq%2BOfqV9p81BiHT7_-pwKvdA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.