I think you should not use "Vanvasi" word considering following points.
1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes
who r forest dwellers?
2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u
define forest?
3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is dwindling.
4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar
proclaimed tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r
subsituting & giving them this perceived derogatory term of Vanvasi?
Few more points for correction assuming u know it not & what u wrote was
not deliberate.
1) Castes & tribes r different; I wont explain pls research.
2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r
different. I know it. U pls read more.
3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story
where Britishers look complete Villain, but the reality cd be different
demanding deeper & systematic investigation.

Best,
Santosh
On Jun 23, 2015 5:54 PM, "e vansakha quarterly magazine" <
evansa...@gmail.com> wrote:

> कातकरी म्हणजे कोण ?
> चलो जलाये दीप वहा
> जहा अभीभी अंधेरा है!
> (वनवासी कल्याण आश्रम)
>
> ८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या
> गावात, कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण
> ग्रामविकास संस्था यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील
> वसतिगृहात देखील नव्याने भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील
> असा प्रयत्न आश्रमाचे कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण
> आणि त्यांच्याकरिता असे विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या
> कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख
> लिहीत  आहे.
>
> राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही  संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम
> भागात शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी
> पत्नी सौ. विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील  हिम्मत शाळेत होते.
> परिसरातल्या बचत गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन
> चालकाचे होते. पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि
> अन्य कार्यकर्त्या आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी
> आणि व्यास सर तिकडे  प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा
> हळूहळू कातकरी या विषयावर आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता
> येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता
> व्यास सर म्हणाले कि संस्थेचे माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता
> येईल आणि तिथून जवळच सेनापती बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय.
> आहे. तिथे मुले शिकू शकतील.
>
> पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे
> सर्वजण उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि
> लाकडी वस्तू उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील
> वाघमारे आणि मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन
> राहायला तयार झाले. पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या
> प्रस्तावाने इतके आनंदित झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास
> सुरु केला. प्रत्येक  कातोडीतून विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे.
> त्याला प्रयत्नांची जोड या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र
> उत्साहाचे वातावरण आहे.
>
> वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही
> यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला
> तर त्याची माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही
> उमटत नाही. कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते.
> त्याचं उत्साह कातोडी वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि
> कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज
> हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की
>  निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला मिळवण्याच्या अर्जावर सही करायला
> बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे
> आणायचे हे खरे आव्हान आहे.
>
> भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे
> आहेत. उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे
> शिकू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका
> समुदायाला एकेक काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये
> स्वत:साठी वापरायची अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या
> बनविण्याची कला गावात सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा
> दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड
> करतात.
>
> भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती
> जनजाती कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे
> बांबूच्या वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला,
> शिकारीची कला, अशा विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन
> होते कात बनविणे आणि विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि
> मनोरंजनासाठी.
>
> या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर,
> इंग्रजांच्या पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी
> करावी लागेल. इंग्रज येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या
> सीमाभागातील, "खैराची"  व इतर विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता.
> झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत
> असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात
> बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची निवड, कात बनवण्याच्या
> प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य भागांचे वर्गीकरण,
> झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य वापर, अर्काच्या
> वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याशी
> वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण करण्याची हातोटी
> अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी माणूस हा विविध
> आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे.
>
> स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे
> मध, लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या  विविध
> गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची
> न्यायव्यवस्था कातकऱ्यांकडे  होती. आज जरी ही  जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली
> असली तरी, त्या काळी ही एक चांगली व्यवस्था होती.
>
> इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली.
> इंग्रजांनी गावातील शेत  जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी
> जंगले नोंदवून त्यांची महसुलाची व्यवस्था बसवली. कातकरी समाज ज्या जंगलात
> वावरत होता ते खाजगी नसून समाजाचे होते, सामाईक होते. हा समाज साधारणपणे
> शासकीय यंत्रणेच्या समोर जाणारा नसल्याने, तो जंगलावर स्वत:चे नाव लावण्यास
> पुढे आला नाही. इंग्रजांनी वनखाते निर्माण करून ही सर्व जंगले स्वत:च्या
> ताब्यात घेतली. इथून कातकऱ्यांचे दुष्टचक्र चालू झाले. ताब्यात घेतलेल्या या
> जंगलांवर इंग्रजांनी कंत्राटदार नेमले. जंगल संपत्तीची लुट करून इंग्रज
> सरकारची तिजोरी भरायची हा या कंत्राटदारांचा उद्योग होता. आजवर कातकरी समाज
> आपल्या गरजेप्रमाणे खैराची झाडे तोडून, आपल्याला आवश्यक तितक्या धना पुरता कात
> बनवीत असे. आता मात्र इंग्रजांच्या अमर्याद लोभापायी वारेमाप जंगलतोड सुरु
> झाली. तोडलेल्या लाकडाचा मालक इंग्रज होता. त्याचे पैसे भरण्याची क्षमता
> कातकऱ्याकडे नव्हती.
>
> इथे बोहरी आणि पारशी कंत्राटदार पुढे आले. काताचे कारखाने यांनी चालू केले
> आणि कातकरी हा मजूर बनून तेथे राबू लागला. कारखाने इतक्या वेगाने खैर संपवू
> लागले कि, आपला मूळ प्रदेश सोडून अन्य प्रदेशात जसे कारखाने स्थलांतरित होऊ
> लागले, तसे कातकरीही  स्थलांतरित होऊ लागले. म्हणून आज कातकरी रत्नागिरीपासून
> सुरत पर्यंत आणि पूर्वेला पुणे जिल्ह्यात देखील आढळतो.
>
> एका संपन्न, कौशल्यपूर्ण, आरोग्यपूर्ण व्यावसायिक समाजाचे अशा रीतीने
> दरिद्री; कुपोषित मजूर समाजामध्ये रुपांतर इंग्रजांमुळे झाले. हे होत असताना
> अन्य समाज आपले हितसंबंध राखताना इतक्या व्यग्र होता कोणी कातकरी लोकांना
> त्याबाबत जागृत देखील केले नाही. आपल्या नावावर कोठेही जमिनीचा एखादा साधा
> तुकडा मिळवण्यातदेखील कातकरी समाज अपयशी ठरला, हीच त्याची शोकांतिका आहे.
>
> हळूहळू काताच्या छोट्या कारखान्यांचे भव्य कारखान्यात रुपांतर झाले. कातकरी
> माणसाकडे असलेल्या कौशल्यांची नव्या कारखान्यांना गरज नव्हती. त्यामुळे हळूहळू
> कातकरी माणूस या व्यवसायातून बाहेर फेकला गेला. कटाची भट्टी बंद पडली आणि मग
> सुरु झाल्या विटांच्या भट्ट्या, कोळशाच्या भट्ट्या आणि सर्वात शेवटी दारूच्या
> भट्ट्या. कोळसा आणि विटांच्या भट्ट्यात कातकरी हा मजूर असतो कारण भांडवल खूप
> लागते. दारूच्या भट्टीसाठी एकतर भांडवल कमी लागते आणि दुसरे म्हणजे हा
> पोलिसांच्या धाकाखालील धंदा असल्याने, गावकरी कातकऱ्यांना या धंद्यासाठी
> भांडवल देतात, आणि भट्टी चालू करण्यास प्रोत्साहन देतात. हा धंदा करणाऱ्या
> माणसाच्या घरात भरपूर पैसा खेळतो पण स्वास्थ्य मुळीच नसते, कारण संपूर्ण
> गावावरून ओवाळून टाकलेली माणसे तिथे येत असतात आणि घरातील माणसांनाही वाईट
> व्यसने लागतात.
>
> वाडीतील छोटी मुले शाळेत जाताना दिसतात, त्यातील बरीचशी मुले मध्येच शाळा
> सोडतात आणि माध्यमिक शाळेत तर तुरळक कातकरी मुले दिसतात. इतर मुलांच्या मानाने
> त्यांना घरी मिळणाऱ्या सुविधा या फारच कमी असतात. मासे पकडायला, खेकडे पकडायला
> जाणे अशी विविध प्रलोभने असतात. त्यामुळे शिक्षणात लक्ष कमी आणि प्रगतीही
> कमी.या सर्व परिस्थितीतही पदवी मिळेपर्यंत शिक्षण घेणारी कातकरी मुले पाहिली
> की खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. या अशाच मुलांना पुढील आयुष्यात स्थिर होता
> यावे यावर देखील आश्रमाचा भर आहे, प्रयत्न आहे.
>
> पनवेलच्या आश्रमातून शिकलेला अनिल वाघमारे हा विद्यार्थी वारली चित्रकला
> शिकून आज तोच त्याचा व्यवसाय म्हणून काम करत आहे. त्याच्या व्यवसायात
> त्याच्याच गावच्या अजून दोन कातकरी मुलांना रोजगार मिळाला आहे. आश्रमाचे एक
> विद्यार्थी एकनाथ वाघे हे आता शिक्षक झाले आहेत. पनवेल अर्बन बँकमध्ये काम
> करणारे सुदाम पवार हे आश्रमाचे विद्यार्थी तर आहेतच परंतु आता ते आश्रमाच्या
> विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. अशी उदाहरणे अनेक आहेत पण समाजाला बदलाच्या
> वाटेवर घेऊन जाण्यास त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.गरज आहे आपण सर्वांनी
> त्यांचे हात बळकट करण्याची.
>
> कातकरी समाज सध्या पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे व पालघर
> जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतो. या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी
> कातकरी समाजात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य करण्याची खरोखर मुख्य निकड आहे. आपण
> पुढील उपक्रम हाती घेऊ शकता:-
>
> १) एखाद्या कातोडी मधील सर्व मुले शाळेत जातील यासाठी प्रयत्न करणे
> २) मुलींची लग्ने योग्य वय झाल्यावरच करण्यासाठी प्रबोधन, जनजागरण करणे
> ३) कातोडीतील महिलांकडून झोपडीत करून घेण्यासारखी छोटी कामे शोधून, त्यांना
> शिकवून, रोजगार निर्माण करून देणे
> ४) "नाग्या कातकरी" या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्याची माहिती सर्वांपर्यंत
> पोहोचवणे
> ५) कातोडीमध्ये "सुंदर माझे घर" अशी स्पर्धा घेऊन, काही गृहोपयोगी बक्षिसे
> वितरीत करून एकप्रकारे कातोडी स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करणे
> ६) संस्कार वर्ग चालवणे
> ७) दारू गाळण्याचा उद्योग करणाऱ्या कुटुंबांना प्रबोधन करणे, त्यांना पर्यायी
> उद्योग देणे
> ८) शिक्षित व अर्धशिक्षित मुला-मुलींना छोटे अभ्यासक्रम, प्रशिक्षण देऊन,
> नोकऱ्या मिळवून देणे, तसेच छोटे व्यवसाय स्थापन करून देणे
> ९) घरे बांधण्यासाठी जागा मिळवून त्यांच्या मालकीची करून देणे, स्थिर वसाहत
> करणे
> १०) लग्नातील अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रबोधन करणे, सामूहिक विवाहासारखे
> उपक्रम राबवणे
> ११) कातकरी मुला-मुलींसाठी खेळाच्या स्पर्धा भरवणे, प्रोत्साहनपर बक्षिसे
> वितरीत करणे
>
> आपण स्वत: कातकरी वस्त्यांवर प्रवास केलात, तर आपल्या अनुभवानुसार आपल्याला
> इतर अन्य उपक्रमही सुचू शकतील आणि आपण ते ही करू शकाल. कल्याण आश्रमामध्ये
> कातकरी जनजाती मधील अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे कातकरी
> समाजात काम करणारे अनेक शहरी कार्यकर्ते आहेत. आपण या सर्वांचे सहकार्य घेऊ
> शकता. आम्ही आपल्या बरोबर काम करण्यास निश्चितच उत्सुक आहोत आणि तयार आहोत.
>
> आपले नम्र,
>
> नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२ (7709013232)
> ऋषभ मुथा -  ९३२५०९३८४० (9325093840)
> सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८ (9921574108)
>
> www.vanvasi.org
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGwE%3Dxh%3D89GnXw5dvHCsnBFq%2BOfqV9p81BiHT7_-pwKvdA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to