Admin Sir, Pls Keep Ayush Only  "ADIVASI" YUVA SHAKTI. Do Not Mix it with These 
"VANSAKHAs(?) !! 

-----Original Message-----
From: "Santosh Gedam" <geda...@gmail.com>
Sent: ‎25-‎06-‎2015 10:31 AM
To: "adiyuva@googlegroups.com" <adiyuva@googlegroups.com>
Subject: Re: AYUSH | कातकरी म्हणजे कोण ?

I think you should not use "Vanvasi" word considering following points.
1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes who 
r forest dwellers?
2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u define 
forest?
3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is dwindling.
4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar proclaimed 
tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r subsituting & giving 
them this perceived derogatory term of Vanvasi?
Few more points for correction assuming u know it not & what u wrote was not 
deliberate.
1) Castes & tribes r different; I wont explain pls research.
2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r 
different. I know it. U pls read more.
3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story where 
Britishers look complete Villain, but the reality cd be different demanding 
deeper & systematic investigation.
Best,
Santosh
On Jun 23, 2015 5:54 PM, "e vansakha quarterly magazine" <evansa...@gmail.com> 
wrote:

कातकरी म्हणजे कोण ?
चलो जलाये दीप वहा
जहा अभीभी अंधेरा है!
(वनवासी कल्याण आश्रम)


८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या गावात, 
कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था 
यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील वसतिगृहात देखील नव्याने 
भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील असा प्रयत्न आश्रमाचे 
कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण आणि त्यांच्याकरिता असे 
विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक 
या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख लिहीत  आहे.


राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही  संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात 
शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी पत्नी सौ. 
विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील  हिम्मत शाळेत होते. परिसरातल्या बचत 
गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन चालकाचे होते. 
पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि अन्य कार्यकर्त्या 
आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी आणि व्यास सर तिकडे  
प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा हळूहळू कातकरी या विषयावर 
आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे 
केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता व्यास सर म्हणाले कि संस्थेचे 
माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता येईल आणि तिथून जवळच सेनापती 
बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय. आहे. तिथे मुले शिकू शकतील.    


पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे सर्वजण 
उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि लाकडी वस्तू 
उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील वाघमारे आणि 
मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन राहायला तयार झाले. 
पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या प्रस्तावाने इतके आनंदित 
झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास सुरु केला. प्रत्येक  कातोडीतून 
विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. त्याला प्रयत्नांची जोड या सर्व 
कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.


वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही यंत्रणा आज 
आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला तर त्याची 
माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही उमटत नाही. 
कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते. त्याचं उत्साह कातोडी 
वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा 
निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा 
आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की  निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला 
मिळवण्याच्या अर्जावर सही करायला बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना 
स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे आणायचे हे खरे आव्हान आहे.  


भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे आहेत. 
उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे शिकू शकतात 
आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका समुदायाला एकेक 
काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये स्वत:साठी वापरायची 
अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या बनविण्याची कला गावात 
सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु 
त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड करतात.


भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती जनजाती 
कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे बांबूच्या 
वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला, शिकारीची कला, अशा 
विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते कात बनविणे आणि 
विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि मनोरंजनासाठी.  


या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर, इंग्रजांच्या 
पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी करावी लागेल. इंग्रज 
येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमाभागातील, "खैराची"  व इतर 
विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता. झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल 
त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, 
विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची 
निवड, कात बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य 
भागांचे वर्गीकरण, झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य 
वापर, अर्काच्या वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या 
व्यापाऱ्याशी वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण 
करण्याची हातोटी अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी 
माणूस हा विविध आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे.


स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे मध, 
लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या  विविध गोष्टी 
त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची न्यायव्यवस्था 
कातकऱ्यांकडे  होती. आज जरी ही  जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली असली तरी, त्या 
काळी ही एक चांगली व्यवस्था होती.


इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली. इंग्रजांनी 
गावातील शेत  जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी जंगले �

[The entire original message is not included.]

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/558b9d44.e591420a.b91a4.fffff15e%40mx.google.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to