very true santosh, some people purposley use girijan also we are adivasi 2015-06-25 10:31 GMT+05:30 Santosh Gedam <geda...@gmail.com>:
> I think you should not use "Vanvasi" word considering following points. > 1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes > who r forest dwellers? > 2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u > define forest? > 3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is > dwindling. > 4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar > proclaimed tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r > subsituting & giving them this perceived derogatory term of Vanvasi? > Few more points for correction assuming u know it not & what u wrote was > not deliberate. > 1) Castes & tribes r different; I wont explain pls research. > 2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r > different. I know it. U pls read more. > 3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story > where Britishers look complete Villain, but the reality cd be different > demanding deeper & systematic investigation. > > Best, > Santosh > On Jun 23, 2015 5:54 PM, "e vansakha quarterly magazine" < > evansa...@gmail.com> wrote: > >> कातकरी म्हणजे कोण ? >> चलो जलाये दीप वहा >> जहा अभीभी अंधेरा है! >> (वनवासी कल्याण आश्रम) >> >> ८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या >> गावात, कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण >> ग्रामविकास संस्था यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील >> वसतिगृहात देखील नव्याने भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील >> असा प्रयत्न आश्रमाचे कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण >> आणि त्यांच्याकरिता असे विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या >> कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख >> लिहीत आहे. >> >> राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम >> भागात शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी >> पत्नी सौ. विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील हिम्मत शाळेत होते. >> परिसरातल्या बचत गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन >> चालकाचे होते. पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि >> अन्य कार्यकर्त्या आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी >> आणि व्यास सर तिकडे प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा >> हळूहळू कातकरी या विषयावर आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता >> येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता >> व्यास सर म्हणाले कि संस्थेचे माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता >> येईल आणि तिथून जवळच सेनापती बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय. >> आहे. तिथे मुले शिकू शकतील. >> >> पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे >> सर्वजण उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि >> लाकडी वस्तू उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील >> वाघमारे आणि मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन >> राहायला तयार झाले. पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या >> प्रस्तावाने इतके आनंदित झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास >> सुरु केला. प्रत्येक कातोडीतून विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. >> त्याला प्रयत्नांची जोड या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र >> उत्साहाचे वातावरण आहे. >> >> वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही >> यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला >> तर त्याची माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही >> उमटत नाही. कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते. >> त्याचं उत्साह कातोडी वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि >> कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज >> हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की >> निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला मिळवण्याच्या अर्जावर सही करायला >> बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे >> आणायचे हे खरे आव्हान आहे. >> >> भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे >> आहेत. उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे >> शिकू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका >> समुदायाला एकेक काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये >> स्वत:साठी वापरायची अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या >> बनविण्याची कला गावात सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा >> दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड >> करतात. >> >> भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती >> जनजाती कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे >> बांबूच्या वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला, >> शिकारीची कला, अशा विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन >> होते कात बनविणे आणि विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि >> मनोरंजनासाठी. >> >> या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर, >> इंग्रजांच्या पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी >> करावी लागेल. इंग्रज येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या >> सीमाभागातील, "खैराची" व इतर विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता. >> झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत >> असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात >> बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची निवड, कात बनवण्याच्या >> प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य भागांचे वर्गीकरण, >> झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य वापर, अर्काच्या >> वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याशी >> वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण करण्याची हातोटी >> अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी माणूस हा विविध >> आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे. >> >> स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे >> मध, लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या विविध >> गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची >> न्यायव्यवस्था कातकऱ्यांकडे होती. आज जरी ही जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली >> असली तरी, त्या काळी ही एक चांगली व्यवस्था होती. >> >> इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली. >> इंग्रजांनी गावातील शेत जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी >> जंगले नोंदवून त्यांची महसुलाची व्यवस्था बसवली. कातकरी समाज ज्या जंगलात >> वावरत होता ते खाजगी नसून समाजाचे होते, सामाईक होते. हा समाज साधारणपणे >> शासकीय यंत्रणेच्या समोर जाणारा नसल्याने, तो जंगलावर स्वत:चे नाव लावण्यास >> पुढे आला नाही. इंग्रजांनी वनखाते निर्माण करून ही सर्व जंगले स्वत:च्या >> ताब्यात घेतली. इथून कातकऱ्यांचे दुष्टचक्र चालू झाले. ताब्यात घेतलेल्या या >> जंगलांवर इंग्रजांनी कंत्राटदार नेमले. जंगल संपत्तीची लुट करून इंग्रज >> सरकारची तिजोरी भरायची हा या कंत्राटदारांचा उद्योग होता. आजवर कातकरी समाज >> आपल्या गरजेप्रमाणे खैराची झाडे तोडून, आपल्याला आवश्यक तितक्या धना पुरता कात >> बनवीत असे. आता मात्र इंग्रजांच्या अमर्याद लोभापायी वारेमाप जंगलतोड सुरु >> झाली. तोडलेल्या लाकडाचा मालक इंग्रज होता. त्याचे पैसे भरण्याची क्षमता >> कातकऱ्याकडे नव्हती. >> >> इथे बोहरी आणि पारशी कंत्राटदार पुढे आले. काताचे कारखाने यांनी चालू केले >> आणि कातकरी हा मजूर बनून तेथे राबू लागला. कारखाने इतक्या वेगाने खैर संपवू >> लागले कि, आपला मूळ प्रदेश सोडून अन्य प्रदेशात जसे कारखाने स्थलांतरित होऊ >> लागले, तसे कातकरीही स्थलांतरित होऊ लागले. म्हणून आज कातकरी रत्नागिरीपासून >> सुरत पर्यंत आणि पूर्वेला पुणे जिल्ह्यात देखील आढळतो. >> >> एका संपन्न, कौशल्यपूर्ण, आरोग्यपूर्ण व्यावसायिक समाजाचे अशा रीतीने >> दरिद्री; कुपोषित मजूर समाजामध्ये रुपांतर इंग्रजांमुळे झाले. हे होत असताना >> अन्य समाज आपले हितसंबंध राखताना इतक्या व्यग्र होता कोणी कातकरी लोकांना >> त्याबाबत जागृत देखील केले नाही. आपल्या नावावर कोठेही जमिनीचा एखादा साधा >> तुकडा मिळवण्यातदेखील कातकरी समाज अपयशी ठरला, हीच त्याची शोकांतिका आहे. >> >> हळूहळू काताच्या छोट्या कारखान्यांचे भव्य कारखान्यात रुपांतर झाले. कातकरी >> माणसाकडे असलेल्या कौशल्यांची नव्या कारखान्यांना गरज नव्हती. त्यामुळे हळूहळू >> कातकरी माणूस या व्यवसायातून बाहेर फेकला गेला. कटाची भट्टी बंद पडली आणि मग >> सुरु झाल्या विटांच्या भट्ट्या, कोळशाच्या भट्ट्या आणि सर्वात शेवटी दारूच्या >> भट्ट्या. कोळसा आणि विटांच्या भट्ट्यात कातकरी हा मजूर असतो कारण भांडवल खूप >> लागते. दारूच्या भट्टीसाठी एकतर भांडवल कमी लागते आणि दुसरे म्हणजे हा >> पोलिसांच्या धाकाखालील धंदा असल्याने, गावकरी कातकऱ्यांना या धंद्यासाठी >> भांडवल देतात, आणि भट्टी चालू करण्यास प्रोत्साहन देतात. हा धंदा करणाऱ्या >> माणसाच्या घरात भरपूर पैसा खेळतो पण स्वास्थ्य मुळीच नसते, कारण संपूर्ण >> गावावरून ओवाळून टाकलेली माणसे तिथे येत असतात आणि घरातील माणसांनाही वाईट >> व्यसने लागतात. >> >> वाडीतील छोटी मुले शाळेत जाताना दिसतात, त्यातील बरीचशी मुले मध्येच शाळा >> सोडतात आणि माध्यमिक शाळेत तर तुरळक कातकरी मुले दिसतात. इतर मुलांच्या मानाने >> त्यांना घरी मिळणाऱ्या सुविधा या फारच कमी असतात. मासे पकडायला, खेकडे पकडायला >> जाणे अशी विविध प्रलोभने असतात. त्यामुळे शिक्षणात लक्ष कमी आणि प्रगतीही >> कमी.या सर्व परिस्थितीतही पदवी मिळेपर्यंत शिक्षण घेणारी कातकरी मुले पाहिली >> की खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. या अशाच मुलांना पुढील आयुष्यात स्थिर होता >> यावे यावर देखील आश्रमाचा भर आहे, प्रयत्न आहे. >> >> पनवेलच्या आश्रमातून शिकलेला अनिल वाघमारे हा विद्यार्थी वारली चित्रकला >> शिकून आज तोच त्याचा व्यवसाय म्हणून काम करत आहे. त्याच्या व्यवसायात >> त्याच्याच गावच्या अजून दोन कातकरी मुलांना रोजगार मिळाला आहे. आश्रमाचे एक >> विद्यार्थी एकनाथ वाघे हे आता शिक्षक झाले आहेत. पनवेल अर्बन बँकमध्ये काम >> करणारे सुदाम पवार हे आश्रमाचे विद्यार्थी तर आहेतच परंतु आता ते आश्रमाच्या >> विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. अशी उदाहरणे अनेक आहेत पण समाजाला बदलाच्या >> वाटेवर घेऊन जाण्यास त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.गरज आहे आपण सर्वांनी >> त्यांचे हात बळकट करण्याची. >> >> कातकरी समाज सध्या पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे व पालघर >> जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतो. या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी >> कातकरी समाजात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य करण्याची खरोखर मुख्य निकड आहे. आपण >> पुढील उपक्रम हाती घेऊ शकता:- >> >> १) एखाद्या कातोडी मधील सर्व मुले शाळेत जातील यासाठी प्रयत्न करणे >> २) मुलींची लग्ने योग्य वय झाल्यावरच करण्यासाठी प्रबोधन, जनजागरण करणे >> ३) कातोडीतील महिलांकडून झोपडीत करून घेण्यासारखी छोटी कामे शोधून, त्यांना >> शिकवून, रोजगार निर्माण करून देणे >> ४) "नाग्या कातकरी" या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्याची माहिती सर्वांपर्यंत >> पोहोचवणे >> ५) कातोडीमध्ये "सुंदर माझे घर" अशी स्पर्धा घेऊन, काही गृहोपयोगी बक्षिसे >> वितरीत करून एकप्रकारे कातोडी स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करणे >> ६) संस्कार वर्ग चालवणे >> ७) दारू गाळण्याचा उद्योग करणाऱ्या कुटुंबांना प्रबोधन करणे, त्यांना >> पर्यायी उद्योग देणे >> ८) शिक्षित व अर्धशिक्षित मुला-मुलींना छोटे अभ्यासक्रम, प्रशिक्षण देऊन, >> नोकऱ्या मिळवून देणे, तसेच छोटे व्यवसाय स्थापन करून देणे >> ९) घरे बांधण्यासाठी जागा मिळवून त्यांच्या मालकीची करून देणे, स्थिर वसाहत >> करणे >> १०) लग्नातील अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रबोधन करणे, सामूहिक विवाहासारखे >> उपक्रम राबवणे >> ११) कातकरी मुला-मुलींसाठी खेळाच्या स्पर्धा भरवणे, प्रोत्साहनपर बक्षिसे >> वितरीत करणे >> >> आपण स्वत: कातकरी वस्त्यांवर प्रवास केलात, तर आपल्या अनुभवानुसार आपल्याला >> इतर अन्य उपक्रमही सुचू शकतील आणि आपण ते ही करू शकाल. कल्याण आश्रमामध्ये >> कातकरी जनजाती मधील अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे कातकरी >> समाजात काम करणारे अनेक शहरी कार्यकर्ते आहेत. आपण या सर्वांचे सहकार्य घेऊ >> शकता. आम्ही आपल्या बरोबर काम करण्यास निश्चितच उत्सुक आहोत आणि तयार आहोत. >> >> आपले नम्र, >> >> नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२ (7709013232) >> ऋषभ मुथा - ९३२५०९३८४० (9325093840) >> सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८ (9921574108) >> >> www.vanvasi.org >> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGwE%3Dxh%3D89GnXw5dvHCsnBFq%2BOfqV9p81BiHT7_-pwKvdA%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGwE%3Dxh%3D89GnXw5dvHCsnBFq%2BOfqV9p81BiHT7_-pwKvdA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- चेतन व. गुराडा. Chetan V. Gurada. Assistant Professor, University Department of Physics (Autonomous), University of Mumbai Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India) mobile - 9869197376 e-mail: chet...@physics.mu.ac.in che...@mu.ac.in -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RTyqq_rUxxXqUfTF7EV04sA7wE-HtYXwWUKqc7Y_nQxw%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.