zarkhand हूल बडे धूमधाम से मानाया
AYUSHonline team www.adiyuva.in 2015-06-30 11:39 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>: > (या भागात उठावाची माहिती दिली आहे ) > स्वातंत्र्याची हि लढाई सुसज्ज व सशस्त्र मार्गाने लढावी लागणार हे स्पष्ट > होते ,म्हणूनच सिदो ,कान्हू यांनी संथाळी सैनिकांच्या अनेक तुकड्या तयार > केल्या होत्या . त्यापैकी एका तुकडीने फुदगीर गावावर हल्ला बोल केला व अनेक > इंग्रजांना देशोधडीला पाठवले. > तर सैन्याची दुसरी तुकडी साहिबगंज येथे रवाना झाली या तुकडीने इंग्रजांवर > आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मात्र इंग्रज व संथाळ सैनिक यातील अंतर बरेच > जास्त असल्यामुळे हा प्रयत्न फसला. इंग्रज मात्र या आक्रमणा नंतर शांत बसणार > नव्हते ,त्यांनी त्वेषाने गोळीबार सुरु केला या गोळीबारात अनेक संथाळ सैनिक > धारातीर्थी पडले. आता मात्र या विद्रोहाने उग्र रूप धारण केले. > इंग्रज व संथाळ यात पैलपूर येथे घमासान युद्ध झाले. यात अनेक संथाल सैनिक > शहीद झाले मात्र सर्वात मोठे नुकसान झाले ते कान्हू यांच्या वीर मरणाने! > कान्हू या युद्धात शहीद झाले होते । > यानंतर रघुनाथपूर ,संग्रामपूर ,बडहैत अशा ठिकाणी उठाव झाले , प्रचंड संख्येने > संथाळी सैनिक मारले गेले . इतकी जीवितहानी होवूनही संथाळ सैनिक मागे हटायला > तयार नाहीत हे पाहून धूर्त इंग्रजांनी या उठावाचा पाडाव करण्यासाठी फोड व > झोडा नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. व बडहैत येथील एका व्यक्तीला आपल्या बाजूने > वळवून घेतले. व पुढे याच व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळेच इंग्रज सिदो यांना > पकडू शकले . इतिहास साक्ष आहे कि,इग्रजांनी याच नीतीचा अवलंब करत अनेक > क्रांतिवीरांना बंदी बनवले होते. आपला नेता पकडला गेला आहे तरी मनोधैर्य खचून > न देत ३०००० संथाल क्रांतिकारकांनी इंग्रजांना शरण न येण्याचे ठरविले. मात्र > प्रचंड उपासमार व आजाराच्या संक्रमणामुळे हे क्रांतिकारक बेहाल झाले होते. > या क्रांतिकारकांवर दहशत बसून त्यांनीआपल्याला शरण यावे यासाठी इग्रजांनी > सिदो व त्यांच्या काही साथीदारांना उघडपणे फासावर चढवले परंतु ते न डगमगता > जयघोष करत फासावर चढले. हा उठाव गैर आदिवासिंविरुद्ध आहे असा खोटा समाज > पसरवण्यास इग्रजांनी सुरवात केली मात्र संथाळांच्या मनातली राष्ट्रभावना कधीच > शमली नाही. > या उठावात ३०००० च्या आसपास संथाली सैनिक व जनता मारली गेली. इतका प्रचंड > नरसंहार इतिहासात कदाचित घडला असेल . इतकेच काय या उठवत एकाच वडिलांचे ४ > सुपुत्र इतकेच काय त्यांच्या २ मुली यांनी देखील उठावात भाग घेतला हि घटना > अद्वितीय आहे .हा उठाव 'संथाळ हुल' म्हणून ओळखला जावू लागला . व ३० जून हा > दिवस 'संथाळ हूल दिवस' म्हणून !!परन्तु इतिहासकारांनी शालेय > पाठ्यपुस्तकांमध्ये 'संथाळाचा उठाव' एव्हडीच काय ती नोंद घेतली. > इग्रजांनी बांधलेला पकौड येथील martela टॉवर या उठावाचे प्रतिक आहे .. > अशाप्रकारे जंगलतरी जिल्हा बिहार च्या (सध्या झारखंड )संथाळ परगणा नावाने > प्रसिध्द झाला. या व्यापक क्रांतीनंतर जंगलतरी जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार > गव्हर्नर च्या हाती देण्यात आला . > या क्रांतीकारकांना व साहसी संथाळी जनतेला मानाचा जोहार !! > आज संथाल हूल दिवस । सिदो ,कान्हू ,चांद ,भैरो यांचा इतिहास आपल्याला माहित > नाही हि फार खेदाची बाब आहे . हा लेख लिह्ण्यामागचा उद्देश हाच कि इतिहासाने > नोंद घेतली असेल नसेल पण आदिवासी म्हणून आपल्या क्रांतिकारकांचा इतिहास > आपल्याला माहित असावाच व आपण तो आपल्या पुढच्या पिढीस देण्यास सक्षम असले > पाहिजे . केवळ आज whtsupp वर व facebook वर thums up किंवा like करून विसरून न > जाता हा शालेय मुलांपर्यंत पोचवावा इतकाच आग्रह ! > सिदो कान्हू खुड खुडी भितोरे > चांद भैरो घोडा युपो रे > देखो रे चांद रे ,भैरो रे > घोड भैरो मुलिने मुलिने > > संदर्भ -आदिवासी वीर (संपादक -जेल सिंग पावरा ) > शब्दांकन _संचिता सातवी > On 30 Jun 2015 10:31, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in> > wrote: > >> संथाळ हूल -हूल म्हणजे विद्रोह. सिदो ,चांद ,भैरो ,कान्हू हे चार मुर्मू >> बंधु या विद्रोहाचे खरे शिल्पकार !साहिबगंज जिल्ह्यातील भोगनाडीह गावातील चुलू >> संथाळा चे सुपुत्र ! >> भारताच्या उत्तर पूर्व भागात ईस्ट इंडिया कंपनी चे साम्राज्य स्थापित झाले >> ,आणि १७६५-६६ मध्ये बंगाल ,बिहार,उडीसा राज्यातील कर वसुलीचा अधिकार >> कंपनीच्या हाती आला तर संरक्षण ,न्याय आणि दंड व्यवस्था या नवाबांच्या हाती >> राहिल्या . अशा दुहेरी शासन व्यवस्थेमुळे जनता अधिकच त्रस्त झाली होती. >> कंपनीला केवळ कर वसुली करायची होती त्यांना जनतेच्या सुख दुखाशी काही लेणेदेने >> नव्हते . हा काळ जनतेसाठी खूप भयावह होता ,जनतेवर इंग्रजांचे अत्याचार >> दिवसेंदिवस वाढत चालले होते. >> संथाल स्त्री पुरुष रस्ते बांधणीच्या कामासाठी मजुरीवर जात होते,तेथे >> त्यांना जबरदस्तीने धर्म व संस्कृती लुटली जात होती,जबरदस्तीने त्यांचे >> ख्रिस्तीकरण करण्यात येत होते. ५०%ते ५००% पर्यंत या जनतेला कर भरावा लागत >> होता. यामुळे संथाळ आदिवासींमध्ये आक्रोश व संताप वाढू लागला. >> हाच आक्रोश ,संताप जुन १८५५ मध्ये अशा प्रकारे बाहेर आला कि आज इतिहासात तो >> संथाल हूल म्हणून प्रसिध्द आहे . >> संथालांवरील या अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यास सिदो, कान्हू,चांद ,आणि >> भैरो या चार भावांनी सुरवात केली . त्यांनी लोकांना सांगितले कि,'देवी स्वयं >> येवून तिने आम्हाला संथालांच्या या स्वातंत्रप्राप्तीचे नेतृत्व तुम्ही करा >> असे सांगितले आहे '. 'महादेवाने आम्हाला ७ वेळा दर्शन देवून सांगितले आहे, कि >> येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास जनतेने तयार राहावे, तरच स्वतंत्र मिळू शकेल >> .' या बोलण्याच्या जनतेच्या मनावर खोलवर परिणाम झाला व त्यांनी सिदो >> ,कान्हू,चंद ,भैरो यांना आपले नेते मानण्यास सुरवात केली . येथूनच विद्रोहाला >> सुरवात झालि . >> इग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सिदो ,कान्हू,चांद ,भैरो यांनी विविध योजना >> क्लृप्त्या लढवल्या. 'जे लोक संथालांच्या या लढ्यात संथाली सेनेला अन्नाचा >> पुरवठा करणार नाहीत त्यांना देशद्रोही घोषित केले जाईल व त्यांचा धान्य साठा >> लुटला जाईल; . इतकेच काय त्यांचा नारा होता कि जमीनदार , सावकार,पोलिस >> ,सरकारी कर्मचारी यांचा नाश होवो ."जे आम्हाला विरोध करणार त्यांचा आम्ही नाश >> करू अशी त्यांनी प्रतिद्या घेतली . " >> अखेर या अन्याय ,अत्याचार शोषण व स्वातंत्र्याच्या लढाईचा तो दिवस उगवलाच >> !३० जून १८५५ रोजी पौर्णिमेच्या दिवशी जवळ पास १०,००० हजार संथाली आदिवासी >> जनता तीर कमान ,कोयता ,तलवार आदि शस्त्र घेवून संथाळ परगणाच्या भोगनाडीह >> गावात जमा झाले व घोषणा केली कि , 'आमच्यावर कुणाची सत्ता नाही. कुणी राजा >> ,पोलिस व इंग्रजांची आमच्यावर सत्ता नाही आमचे संथालांचे राज्य आजपासून >> स्थापित झाले आहे ".व सिदो आणि कान्हू यांना सुबा म्हणजेच त्यांचे राजा >> बनवण्यात आले . >> यादरम्यान एका छोट्याश्या घटनेने विद्रोहाची ठिणगी पाडली व पुढे ती वणवा >> बनून पेटली. >> दिघी गावाचे इंग्रज पोलिस अधिकारी व सावकार हे दोन संथाल कैद्यांना पंचकाठी >> मार्गे भागलपूर कडे घेवून जात असल्याची गुप्त खबर सिदो व कान्हू यांना लागली व >> या कैद्यांना सोडवण्यासाठी ते या इंग्रज अधिकारयासमोर उभे ठाकले , यावेळेस >> त्यांना पकडून बंदी बनवण्याचे आदेश इंग्रजामार्फत देण्यात आले. ,मात्र सिदो व >> ,कान्हू यांच्या सोबत आलेल्या संथाल जनतेने जोरदार विरोध केला व या >> प्रतिकारात पोलिस व सावकार मारले गेले . >> येथूनच खर्या विद्रोहाला सुरवात झाली. >> >> (संदर्भ -आदिवासी विर संपादक -जेलसिंग पावरा ) >> शब्दांकन -संचिता सातवी >> >> ( उर्वरित भागात या विद्रोहाचे सविस्तर विश्लेषण पहा ) >> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuyfr5d8dJHWwua%2BmsyZjtuBQqkiTy5rhfr_v1OAQgWyA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.