<https://lh5.googleusercontent.com/-YaY6iFzM27U/U4zF-s62RdI/AAAAAAAAHdE/OZundtdV8Ig/s1600/nandore.jpg>
On Sunday, June 1, 2014 1:06:50 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित > आहेत....अच्छे दिन आनेवाले है म्हणणारे असोत वा हर हाथ शक्तिचा उहापोह करणारे > असोत कोणीही या कर्मचा-यांच्या मानसिकतेचा विचार करताना दिसत नाही. > आश्रमशालार्थ योजनेनुसार online पेमेंट करण्याच्या नावाखाली काही तांत्रिक > अड़चनी सांगुन सर्वांचे पेमेंट थाम्बवुन ठेवले आहेत. जून महिन्यात शाळा सुरु > होतील, आपण याच कर्मचा-यांकडून प्रामाणिक कामाची अपेक्षा करत असतो. अनेकदा > तक्रारीसुध्दा करतो. आज याच कर्मचा-यांना वेठबिगारांपेक्षा वाईट वागणूक दिली > जात आहे. यात आदिवासी विकास विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला > मिळत आहे. कारण राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा कर्मचा-यांचे नियमित पगार होत > असताना अनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांना अशी सावत्रपणाची का वागणूक दिली जात > आहे असा प्रश्नही सामान्य व्यक्तीला पडतो. > > कर्मचा-यांना असा त्रास दिला तर उद्या याचा विपरीत परिणाम आदिवासी मुलांच्या > गुनवत्तेवर होईल. कदाचित आदिवासी भविष्य जाणीवपूर्वक अंधारात धकलण्याचे तर हे > षढयंत्र तर नाही ना असाही प्रश्न मनाला भेडसावतो. राज्यात आदिवासी विकास > विभागाचा निधि शिल्लक असताना कर्मचा-यांना त्याचे वाटप करण्यात इतकी अनास्था > दर्शविणा-या विभागाला आपले डोके ठिकाणावर ठेवून काम करावे लागेल. अन्यथा या > पापाचे प्रायश्चित्त करण्यास आपणास संधी मिळनार नाही. > > > > On Sunday, June 1, 2014 1:01:09 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > <https://lh5.googleusercontent.com/-46N1Vrf--Co/U4rWrlA8RKI/AAAAAAAAHcs/HQvSo8v26aE/s1600/anudanit.jpg> > > > On Wednesday, May 21, 2014 9:20:38 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti > wrote: > > आदिवासी मुलींना शासकीय वसतिगृहात अपमानास्पद वागणूक > > 'सांगवी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालांकडून > विद्यार्थिनींना अपमानास्पद > वागणूक मिळत आहे. त्यांना शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रकार होत असून, > त्यांचा छळ केला जात आहे,' > अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. > जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, > अशी मागणीही त्यांनी केली आहे. > शकुंतला चव्हाण या वसतिगृहात गृहपाल या पदावर आहेत. वसतिगृहातील > विद्यार्थिनींनी त्यांच्या विरोधात एकात्मिक आदिवासी विकास विभागालाही निवेदन > सादर केले आहे. > विद्यार्थिनींना शासनाकडून स्टेशनरी, प्रोजेक्ट फाइल्स, इतर शैक्षणिक साहित्य > यासाठी मिळणारा शैक्षणिक जमाखर्च पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जात नाही; > तसेच > त्यांचा मासिक भत्तादेखील जमा केला जात नाही. त्यांच्याकडून विद्यार्थिनींची > शैक्षणिक प्रमाणपत्रे > गहाळ झालेली आहेत. याबाबत विद्यार्थिनींनी गृहपालांकडे विचारणा केल्यानंतर > त्यांचे बोलणे, > समस्या व्यवस्थित ऐकून न घेता उलट त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच > कॉलेजमध्ये तुझी तक्रार करीन, > वसतिगृहाचा प्रवेश रद्द करीन, अशा धमक्या त्या देत असल्याचा आरोप > विद्यार्थिनींनी केला आहे. > वसतिगृहातील विद्यार्थिनी अतिशय दुर्गम व ग्रामीण भागातून शिक्षणासाठी > आलेल्या आहेत. येथे > त्यांना चांगले शिक्षण व सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यावरच गदा येत > आहे. प्रचंड त्रास सहन करून करून > त्यांना राहावे लागत असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे असल्याचे परिषदेचे > मंत्री विवेकानंद उजळंबकर > यानी निवेदनात म्हटले आहे. > 'माझे वागणे नियमानुसारच' > दरम्यान, 'विद्यार्थिनी सांगतात तशी परिस्थिती येथे नाही. त्यांना चांगलीच > वागणूक दिली जाते. > नियमानुसार महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर मुलींनी वसतिगृह सोडणे > अपेक्षित आहे; परंतु > स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थिनी परीक्षा संपल्यानंतरही > वसतिगृहातच राहात > आहेत. त्यांना नियमानुसार खोली सोडण्यास सांगितले आहे,' असे वसतीगृहाच्या > गृहपाल शकुंतला चव्हाण > यांनी स्पष्ट केले. 'गेल्या वर्षी घोडेगाव येथील आदिवासी विकास विभागातील > तत्कालीन सहायक प्रकल्प > अधिकाऱ्यांना माझ्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून > पकडले होते. तेव्हापासून ते > मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. या विद्यार्थिनींना हाताशी धरून > त्यांनीच ही तक्रार > द्यायला लावली आहे,' असेही त्यांनी नमूद केले. > > On Friday, April 11, 2014 11:27:12 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > > > > > > > shared by :Pradeep Ambavane > <https://www.facebook.com/pradeep.ambavane?fref=photo> > > On Thursday, April 10, 2014 9:37:15 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti > wrote: > > कोवळी पानगळ.... > > नुकतेच मागच्या महिन्यात एका शासकीय आश्रमशाळेतील आकरावीच्या वर्गात शिकणा-या > दोन मुलींनी आत्महत्या केली. सकाळ वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि मन अगदी > सुन्न झाले....उद्याचा आदिवासी भविष्यकाळ असा मोकळ्या रानी रांडका होत असताना > पाहून लाज वाटत होती.....पण या आश्रमशाळा नावाच्या व्यवस्थ्येत याचे कुठेच > उत्तर मला दिसत नव्हते.....फक्त ७५,००० रुपयांचा चेक हे जर त्यावरचा रामबाण > उपाय असेल...तर मग आदिवासी विकास यातून नेमके काय साधणार याचा काळाकुट्ट अंधार > मनात भीतीची लाट निर्माण करत होता. > > बातमी वाचत असताना माझे मन काही ओळींवर पुन्हा पुन्हा जात होते....आणि > मनातल्या मनात स्वताला खात होते......त्यातील एक ओळ होती, पालकांनी कोणत्याही > प्रकारची जबाबदारी स्वीकारत पोस्टमोर्टेम करण्याची तसदी घेतली नाही. अहो ज्या > जीवांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले अशा या दोन मुली अशा ऐन तारुण्यात > आत्महत्या करतात आणि पालक शांत राहतात याचा नेमका काय अर्थ घ्यायचा.....विशेष > म्हणजे त्या दोन्ही मुली अनेक दिवस शाळेत गेलेल्या नव्हत्या.....विनापरवानगी > गैरहजेरी....आणि त्यात मुली...किती संवेदनशीलता असायला पाहिजे शाळेकडे आणि > पालकांकडे सुद्धा.....परंतु दोन्हींकडून असे काही घडलेले दिसत नाही. पालक जो > आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपली अर्धी भाकर नेहमीच राखून ठेवतो. आज तो असा > निष्काळजी पाहिल्यानंतर मन उद्विग्न झाल्याशिवाय राहत नाही. > > अनेक दिवस मुली गैरहजर म्हटल्यानंतर साहजिकच वर्गशिक्षकांनी ऐन परीक्षेत > हजेरी लावल्यानंतर पालकांना सोबत का आणले नाही अशी विचारणा केली.......पालक > शाळेत आलेच पाहिजे असा आग्रह होणे अपेक्षित होतेच...परंतु दुस-या दिवशीही मुली > शिक्षकांची अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत....शेवटी जबाबदारी आणि तीही > मुलींची म्हटल्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी तीच सुचना....पालकांना सोबत आणलेच > पाहिजे.....तींस-या दिवशीही मुलींसोबत पालक आले नाहीत.....मग यात पालकांचा > निष्काळजीपणा म्हणावा कि मुलींचा निष्काळजीपणा ? > > शिक्षक आपला आग्रह मुलींकडे व्यक्त करत होते.....कारण आजचा काळ आश्रमशाळा > शिक्षकांच्या दृष्टीने तसा अगदीच परीक्षेचा आहे. मुलींच्या बाबतीत सांगायलाच > नको. पेपर संपल्यानंतर मुली ज्या आपल्या गावी गेल्या...त्या काही घरी > पोहचल्याच नाहीत......चौकशीअंती त्यांचे मृतदेह पालकांना आढळून आले. आत्महत्या > केली असे पालकांनीच घोषित केले. कोणत्याही प्रकारचा पंचनामा...पोस्टमोर्टेम न > करता अंत्यविधी करण्यात आला......इथे फक्त दोन मुलींचा मृत्यू झाला असे आपण जर > या प्रकरणाकडे पाहिले तर तो अगदीच भावी पिढीसाठी एक धोका ठरेल. निसर्गाने > प्रत्य > > ... -- ----------------------------------------------------------------------- Warli Painting is Cultural Intellectual, Registered under IPR Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets do it together! (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f5ea0f7a-191e-4c1d-9d40-2bc6dc1bbea6%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.