Good Approach, I Agree to it. We have to give out
information...................Vinay k.




2014-09-08 22:12 GMT+05:30 चेतन Chetan <chetan...@gmail.com>:

>  dear awaj do
> हि माहिती फक्त सर्वाना व्हावी म्हणून upload केली होती .  आदिवासी संस्कृती
> हि जगातली सर्वात जुनी संस्कृती आहे. हिंदू संस्कृती पेक्षाही जुनी . जेव्हा
> आपण  comment करतो तेव्हा आपण सर्व बाबींचा अभ्यास करून comment करायला हवी
> जोश मध्ये होश गमावला तर नुकसान जास्त संभवते . या क्षणी आपण विचार केला तर या
> देशात आदिवासी लोक फक्त ८% आहेत त्यामुळे आपण सर्व जण  जरी देश चालवायला
> निघालो तरी कमी पडू आपल्यावरील अन्याय आणि आपले हक्क हे सर्व भारतवर्षाला
> जाणवून दिले पाहिजे . आपल्या समोर विविध आव्हाने आहेत त्यासाठी येणाऱ्या
> तरुणपिढीला या सर्व गोष्टी माहित व्हायला  नकोत का?
>
> 2014-09-08 17:07 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>
>> आवाज दो!  सध्या आदिवासी समाजाची अस्तित्वाची लढाई चालू असताना खूप सारे
>> प्रश्न आदिवासी समोर आ वासून आहेत.  सुशिक्षित पिढीने जर दुर्लक्ष केले तर
>> आपला समाज नष्ट होवून इतिहासात पण स्थान मिळेल यांची शंका आहे.
>>
>> आयुश व्यासपीठ आदिवासी समाज हिता साठी विविध प्रश्नावर वेग वेगळे मत प्रवाह
>> जाणून आणि भविष्यातील उपाय योजना शोधण्या साठी आहे, येथे आदिवासी समाजाशी
>> संबधित प्रत्येक विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्या साठी अगदी टोकाची
>> भूमिका घेण्य पेक्षा सर्व समावेशक/सकारात्मक/मार्गदर्शक असे विचार पसरविण्या
>> साठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.
>>
>> या ग्रुप वर सगळ्या विचार सरणी ची माणसे आहेत, आपल्यांना सगळ्यात आदिवासी
>> जीवन संस्कृती बद्दल जागरुकता करण्या साठी प्रयत्न करायचे आहेत. कारण सध्या या
>> जगाला जाती मध्ये वाटण्या पेक्षा आदिवासी जीवनसंस्कृतीचे विचार निसर्ग आणि
>> मानव यांच्या हिताचे आहेत. आणि आदिवासी समाजात त्यांची सांस्कृतिक ओळखीची
>> जाणीव, पोटा पाण्याचे प्रश्न अस्तित्वाचे प्रश्न या साठी प्रयत्न करूया ....
>> Lets do it together!
>>
>>
>>
>>
>> On Monday, September 8, 2014 1:58:05 PM UTC+5:30, awajdotribals wrote:
>>>
>>>  हरामखोरांनो आयुषच्या व्यासपिठावर चर्चेसाठी गणपतिपेक्षा महत्वाचा ,
>>> आदिवासी समाजाचा मुद्दा सापडत नाहीं का ? आदिवासी समाजाचे सर्व प्रश्न व
>>> संस्कृतिची चर्चा करुन संपली असेल तर मी.अँडमीन आयुषचे हे पोर्टल बंद करा !!
>>>  ------------------------------
>>> From: चेतन   Chetan <chetan...@gmail.com>
>>> Sent: ‎07-‎09-‎2014 11:02 PM
>>> To: adiyuva@googlegroups.com; AYUSH Adivasi Yuva Shakti
>>> <adiy...@gmail.com>
>>> Subject: AYUSH | गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या
>>>
>>>  गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या
>>>
>>> http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/41882026.cms
>>>
>>>  मंगला सामंत
>>> गणपतीच्या जयजयकारात 'मोरया' हे संबोधन मोठ्या जोशात उच्चारलं जातं. पण
>>> मोरया या संबोधनाचा नेमका अर्थ काय? त्यामागे प्राच‌ीन भारतीय मातृसंस्कृती
>>> कशी दडलेली आहे, त्याचा वेध घेणारा लेख...
>>>
>>> गणेश चतुर्थीला स्वागताला आणि अनंत चतुर्दशीला निरोप देताना, गणपतीला
>>> उद्देशून आपण 'गणपतीबाप्पा मोरया' अशी हाक देत असतो. अशी हाक का दिली जाते?
>>> त्यामागचं रहस्य काय? हे जाणून घेताना, भारताच्या प्राचीन मातृसंस्कृतीतील
>>> पुरावे, अवशेष तपासावे लागतात. कारण गणपती म्हणजे 'गणाची प्रमुख' (पती) ही
>>> संकल्पना मातृसंस्कृतीतून पुढे आलेली आहे. भारतातील प्राचीन-अतिप्राचीन
>>> संस्कृती ही मातृप्रधान होती, हे आता सर्वमान्य झालेलं सत्य आहे.
>>>
>>> अपत्यसंभवामध्ये पुरुषाचंही योगदान असतं, हे सत्य स्त्री-पुरुषास ठाऊक
>>> नसण्याचा काळ हजारो वर्षांचा होता. तोपर्यंत मूल जन्माला घालणारी माता ही
>>> आपोआपच टोळीबाबत निर्णय घेणारी, अन्नपदार्थ वाटून देणारी, औषधोपचार करणारी,
>>> अरिष्टापासून वाचवणारी अशी प्रमुख मानली जात होती. संस्कृतमध्ये 'मा' म्हणजे
>>> वाटप करणे यावरून 'माता' असं संबोधन स्त्रीला आणि 'दोहन' म्हणजे दूध काढणे
>>> यावरून 'दुहिता' हे संबोधन त्या मातेच्या कन्येला आहे. या वस्तुस्थितीतून पुढे
>>> स्त्री-प्रधान टोळी-अवस्था उदयाला आली. या मातृप्रधान टोळ्या प्रथमार्धात जगात
>>> सर्वत्र होत्या. परंतु त्या काळात भटक्या, शिकारी अवस्थेतील जंगली
>>> पुरुष-टोळ्यासुद्धा जगात सर्वत्र होत्या. त्यांच्या हल्ल्यात जगातील अनेक
>>> मातृटोळ्या प्राथमिक अवस्थेतच नष्ट झाल्या. भारतामध्ये मात्र मातृटोळ्यांचं
>>> रूपांतर एका रचनाबद्ध अशा संस्कृतीत झालेलं आढळतं. त्याचे पुरावे आपले प्राचीन
>>> वाङ्मय, महाकाव्यं, पुराणकथा, उत्खननातील अवशेष, मातृदेवतांचं पूजन, धार्मिक
>>> रीती, परंपरा, अंधश्रद्धा या सर्वांमधून, आणि त्याचप्रमाणे आजच्या आदिवासीच्या
>>> चालीरीतीतून, या मातृसंस्कृतीची पावलं स्पष्टपणे दिसतात.
>>>
>>> जगातील सर्व मातृटोळ्यांचं प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे भाषा बोलता येत
>>> नसल्यामुळे, आणि वस्त्राचा शोध लागला नसल्यामुळे टोळी सदस्यांना एकमेकांना
>>> ओळखता येण्यासाठी, विविध पशु, पक्षी, वनस्पती यांच्या खुणांनी, म्हणजे त्यांची
>>> पिसे, शिंगे, शेपट्या, मुखवटे अशी चिन्हे धारण करून वावरणे, हा एकमेव पर्याय
>>> होता. भारतीय संस्कृतीत मत्स्य, कच्छ, वराह, वृषभ, महिष, नाग, मोर, गरुड, हंस,
>>> जटायू, वानर वगैरे नावांनी अशा मातृगण-जमातींचे उल्लेख सापडतात. रामायण
>>> काळातील जटायू किंवा वानर यासुद्धा त्या प्राण्यांचे मुखवटे धारण करणाऱ्या
>>> जमाती होत्या. मातृटोळ्यांना पशु-पक्ष्यांच्या ह्या चिन्हामुळे एकसंधता आली.
>>> त्यांची सुरक्षितता वाढली. त्यांच्या एकत्र राहण्याला अर्थपूर्णता आली. हळूहळू
>>> या चिन्हांवरून मातृटोळ्या ओळखल्या जाऊ लागल्या. अखेरीस ती त्यांची कुलचिन्हे
>>> होऊन गेली. पुढे भाषा विकसित होण्यात अनेक शतके गेली. तोपर्यंत कुलचिन्हांवरील
>>> विश्वास टोळ्यांच्या श्रद्धेमध्ये बदलला. भाषेच्या विकासात मातेला संबोधन आले.
>>> तसे दितीवरून दैत्यगण, दनुमातेचे दानव, अदितीचे आदित्य, कपिलेचे कपिलेय अशी
>>> संबोधनं मातृगणांना आली, तरी कुलचिन्हांवरील श्रद्धा, त्यांची गणातील
>>> प्रतिष्ठापना, पूजन यामध्ये बदल झाला नाही. टोळ्यांमधील चांगल्या घटना,
>>> दुर्घटना किंवा युद्धसंघर्षाचे प्रसंग, विजय मिरवणुका यामध्ये आपापली
>>> कुलचिन्हं मिरवत न्यायची परंपरा गण-जीवनातही तशीच टिकून होती, कारण त्याशिवाय
>>> त्या गणाचा सहभाग समजता येत नसे. आजच्या काळात परिषदेसाठी येणारे
>>> राष्ट्रप्रमुख जसे त्यांच्या राष्ट्रीय पोशाखात असतात, किंवा क्रीडा
>>> स्पर्धेसाठी राष्ट्रं आपापला ध्वज मिरवत आणतात, तेच काम ही कुलचिन्हं करीत
>>> होती. काही ठिकाणी कुलचिन्हांचा उल्लेख 'वाहन' असाही आहे. याबाबत संशोधक असं
>>> मानतात की, जेव्हा दोन मातृगणांमध्ये संघर्ष होत असे, तेव्हा ज्या गणाचा पराभव
>>> होई, त्याचं कुलचिन्ह हे विजेत्या गणाचं वाहन (मांडलिक) म्हटलं जात असे.
>>> विजेत्या गणाची प्रमुख (पती) माता ही पराभूत गणाचे चिन्ह वाहनासारखे मिरवत आणि
>>> दौडत विजयी सभेमध्ये येत असे. याबाबत डॉ. धर्मानंद कोसंबी काही निरीक्षणं
>>> मांडतात. महाराष्ट्र क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिसरात प्राचीन काळात जो संघर्ष
>>> झाला, त्यामध्ये, मातंग (हत्ती) गणाने मूषक (उंदीर) गणाचा पराभव करून मूषकांना
>>> जंगलपट्टीबाहेर हाकललं. या विजयानंतर मातंग गणाची गणपती-माता हत्तीचा मुख‍वटा
>>> लावून, मुषकाला वाहन बनवून मिरवणुकीने आली. दोन गणांमधील हा संघर्ष दीर्घकाळ
>>> आणि तीव्रपणे झालेला दिसतो. म्हणून पुढेही या विजयाची आठवण घरोघरी गणपती मूषक
>>> वाहनासह वाजत-गाजत आणून चालू ठेवली गेली. साधारणपणे, इ.स.पूर्व सुमारे २ ते ३
>>> हजार वर्षांपर्यंत लोखंडी नांगराचा शोध लागण्यापूर्वी, मातांनी 'गणपती' बनून
>>> आणि वाहन घेऊन मिरवणुकीने निघावे, अशी प्रथा चालू होती. दुर्गेने महिषासुराचा
>>> पराभव केला, म्हणून ती महिष वाहनावरून येते, हे आपल्याला माहीत आहेच.
>>> त्याचबरोबर, वैष्णवी गरुडावरून येते, माहेश्वरी बैलावरून येते वगैरे उल्लेख
>>> भारतीय संस्कृतीत फक्त स्त्रियांबाबत सापडतात.
>>>
>>> नांगराच्या शोधानंतर मात्र शेती उद्योगात जी मोठी क्रांती आली, त्यामध्ये
>>> शेती जी विळ्या-कोयत्याने स्त्रियांकडून होत होती, ती पुरुषाहाती गेली. फळे,
>>> भाजी, कंदमुळांऐवजी अमाप धान्य पिकू लागलं. जमीनदारी उदयास येऊन, पुरुष
>>> जमिनीचा व धान्य उत्पादनाचा मालक झाल्यामुळे, स्त्री-वारसाऐवजी पुरुष-वारसाचा
>>> प्रश्न ऐरणीवर आला. आणि इथेच विवाह प्रथेचा चंचुप्रवेश झाला. मातेकडून मुलीकडे
>>> जाणारा वारसा हक्क आणि त्याकरिता विवाहाची नसणारी गरज, हाच संस्कार शेकडो शतके
>>> रूढ होता. पितृसंस्कृतीचे समर्थक जमीनदार आणि राज्यकर्ते यांना हा संस्कार
>>> पुसून टाकण्यासाठी बरेच प्रयास करावे लागले. त्यातून देव-दानव संग्राम, रामायण
>>> आणि महाभारत हे मोठे संघर्ष, मजबूत मातृसंस्कृती उखडण्यासाठी, भारतीय उपखंडात
>>> होऊन गेले. मातृसंस्कृतीतील अवैवाहिक स्त्री-पुरुष संबंध पद्धतीची,
>>> जमीनदार-राज्यकर्त्यांनी मोठीच धास्ती घेतलेली होती. ज्या रीतींमुळे त्यांचं
>>> पितृत्व धोक्यात येत होतं, त्या रीतींचा नायनाट करायला हवा, हे त्यांनी ताडलं.
>>> त्यामुळे 'स्त्री-पुरुष मुक्त संबंध हे नैतिक नाहीत' हा नवा संस्कार रूढ
>>> करण्यासाठी या आक्रमकांनी भारतात हजारो वर्षे स्थिर असलेल्या मातृसंस्कृतीवर
>>> धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक अशा सर्व बाजूंनी हल्ले करण्याचे
>>> राजकारण-धोरण जन्माला घातले. उदा. तत्कालीन राज्यांच्या स्त्री-शासक�
>>>
>>> [The entire original message is not included.]
>>>
>>  --
>> -----------------------------------------------------------------------
>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
>> it together!
>>
>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5ec7ba6a-fae1-4212-a710-423b34238e54%40googlegroups.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5ec7ba6a-fae1-4212-a710-423b34238e54%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>.
>>
>>
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
>
>
> --
>  चेतन व. गुराडा.
> Chetan V. Gurada.
>
> Assistant Professor,
> University Department of Physics (Autonomous),
> University of Mumbai
> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
> mobile - 9869197376
> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>            che...@mu.ac.in
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
> it together!
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QK%3D9MosCghM1iR%2B8-J%3DQKSfc-BJOg6MHTcsYFEt1tgUA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QK%3D9MosCghM1iR%2B8-J%3DQKSfc-BJOg6MHTcsYFEt1tgUA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>.
>
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2B144rSYCES9MVi9EqiwZV9iDLFh556smbYSVTHqUjFQCbxDGA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to